Narayan Rane | नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले – ‘पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले, आयत्या बिळावरचा नागोबा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एका मुलाखतीतून भाजपवर (BJP) हल्लाबोल केल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे ? ते पवारांच्या (Sharad Pawar) आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस… आयत्या बिळावरचा नागोबा, अशा शब्दात नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.

 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कमावलं ते उद्धव ठाकरे यांनी गमावलं. उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे. उद्धव ठाकरे म्हणजे कर्तव्यशून्य माणूस… ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदावर बसले. आयत्या बिळावरचा नागोबा. राज ठाकरेंना (Raj Thackeray) भोंगा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च भोंगा वाजवत आहेत. त्या माणसावर बोलण्यासारखं फार काही नाही, अशी टीका नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.

 

महाराष्ट्र 10 वर्षे पाठीमागे नेला
महाराष्ट्र दिनी (Maharashtra Din) राज्यातील जनतेला काय देणार ते बोलावं.
गरिबी, निरक्षरता, रोजगार, दरडोई उत्पन्न यावर न बोलता उगीचच फुकटची बडबड. उद्धव ठाकरेंना राजकारण जमत नाही.
मुख्यमंत्रीपदावर ते शोभत नाही. त्यांनी महाराष्ट्र 10 वर्षे पाठीमागे नेला, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र सोडले.

 

बाळासाहेबांचे मुल्यमापन कुणी करु नये
बाळासाहेबांच्या गुणांचे मूल्यमापन कुणीच करु नये. भोळे वगैरे तर त्यांना कुणीच समजू नये.
बाळासाहेबांनी शिवसेना (Shivsena) वाढवली मोठी केली. हे ना मुख्यमंत्रिपदाला शोभत, ना त्यांना ते जमत.
त्यांनी साहेबांवर बोलूच नये, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

 

Web Title :- Narayan Rane | union minister narayan rane slam maharashtra cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा