दिल्लीत AC मध्ये बसणाऱ्यांना तुमचे दुःख कळणार नाही : नरेंद्र मोदी

अकलूज : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र, गुजरात तसेच इतर काही राज्यांमध्ये काल अचानकच वातावरण बिघडले. काही ठिकाणी जोराचा पाऊस झाला तर काही ठिकाणी वादळ आले त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे जीव गेले. याचे मला दुःख आहे. वादळातिल प्रभावित लोकांना तातडीने मदत करू. तसेच तुमच्या सगळ्यांच्या सुख दुःखांमध्ये भाजपा सरकार तुमच्या सोबत आहे. असे नरेंद्र मोदी यांनी म्हंटले. तसेच दिल्लीत एसीत बसणाऱ्यांना तुमचे दुःख कळणार नाही. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अकलूज येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

देश चालवायचा असेल तर मजबूत देश आणि मजबूत नेता पाहिजे. देशाला मजबूत करण्यासाठी, पुढे नेण्यासाठी केंद्रामध्ये भाजपा सारखी मजबूत सरकार पाहिजे. आता तुम्ही ठरवणार तुम्हाला मजबूत देश पाहिजे का कमजोर देश पाहिजे. काँग्रेस आघाडी देशाला मजबूत नाही तर मजबूर देश बनवणार आहे.

काँग्रेस आघाडीचा मोदीला खाली बसवणे हाच एक उद्देश आहे. त्यांना देश कसा पुढे न्यायचा, विकासाबाबत काय करायचे, देश मोठा कसा होईल याचे काही धोरण नाही. आधीच्या सरकारच्या वेळी किती भ्रष्टाचार होत होते. भाजपच्या सरकारमध्ये एकही घोटाळा झाला नाही. एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. त्यामुळे काळापैसा, आणि भ्रष्टाचारावर थेट हल्ला केला. आणि थकीत कर्जदारांकडून पैसेही वसूल केले. असेही मोदी म्हणाले.

याचबरोबर, याआधी महाराष्ट्रात किती दहशतवादी हल्ले झाले. त्यावेळेस यांचेच सरकार होते ना, त्यावेळी त्यांनी काय केले. त्यांनी काही केले नाही. भाजप सरकारने हल्ला करणाऱ्यांना घरात घुसून मारले आणि हे देशाच्या सैनिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दहशतवाद्यांना संपवण्यासाठी घरात घुसून मारण्याची गरज आहे. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.