नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीमध्ये नाणार प्रकल्पावरून भाजपवर दबाव तंत्र वापरून शिवसेनेने हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडले होते. त्यानंतर आता शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत भाजपला टार्गेट केले आहे. राम मंदिर प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. राम मंदिराचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. न्यायालय प्रकरण ऐकून घेत आहे. हे वाचाळवीर कुठून टपकतात असा खोचक टोला मोदींनी शिवसेनेला लगावला आहे.
PM Modi in Nashik, Maharashtra: I am astonished where did these 'bayan bahadur' come from? Why are they creating obstacles? We should trust Supreme Court, the Constitution & judiciary of India. I request these people to trust the judiciary of India, for God's sake. https://t.co/ELgPvP7XB5
— ANI (@ANI) September 19, 2019
काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. जम्मू-काश्मीरसाठीचे 370 कलम रद्द करताना केंद्र सरकारने जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच पाऊल अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी उचलत त्यासाठी कायदा करावा अशी मागणी केली होती. मोदींचा वाचाळवीर हा टोला उद्धव ठाकरे यांच्यासाठीच होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिरावर त्यांची भुमिका स्पष्ट केली. राम मंदिर प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यासाठी न्यायालयावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही लोक राम मंदिरासंबंधी नको ती वक्तव्य करत आहेत.
Visit – policenama.com
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा