मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिह राजपूत आत्महत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे. त्यात अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी केलेल्या ट्विटमुळं नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांनतर आता , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हंटले कि, ‘अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट हे सुशांत सिंह राजपूत यांच्याविषयी आहे. या ट्विटचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये. त्याचप्रमाने मुंबई सुरक्षित आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही, पण, सुशांत सिंह राजपुत आत्महत्येप्रकरणी जनतेला उत्तर हवं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हंटले. दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाने बिहार सोबतच महाराष्ट्रातील राजकारणही ढवळून निघालं आहे. प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहारच्या पोलिस पथकातील एका अधिकाऱ्याला क्वारंटाइन केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपने या मुद्द्यावर राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
ते म्हणाले कि, मुंबई पोलिसांवर माझा कोणताही आरोप नाही, कारण माझ्याकडे गृहमंत्रीपद असताना याच पोलिसांसोबत मी काम केल आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस चांगलं काम करतायेत. मात्र, बऱ्याचदा राजकीय दबावामुळं पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण होतो. फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या चौकशीवरून सरकारच्या भूमिकेवर टीका करत ‘राज्य सरकार बिहार पोलिसांना त्यांचं कर्तव्य न बजावू देता अनावश्यक संशयाच्या भोवऱ्यात का पडत आहे? असा सवाल उपस्थित केला’
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हंटले कि, केरळमधील वैद्यकीय पथकानं मुंबईला भेट दिली, उत्तर प्रदेश पोलिसही विकास दुबे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आले होते, तसंच, बिहार पोलिसांची एक टीम आधीपासूनच मुंबईत कार्यरत आहे. परंतु यापैकी कुणालाच अडचणीत आणलं गेलं नाही. मग बिहारच्या पोलिस अधिक्षकांनाच वेगळी वागणूक का? या वागणूकीमुळं सुशांतच्या मृत्यूचे गूढ सुटण्याऐवजी लोकांच्या मनात संशय निर्माण होईल, असं केलं आहे.
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस ?
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटले कि, ‘या प्रकरणाचा ज्या पद्धतीने तपास सुरू आहे, त्यावरून मुंबईने माणुसकी गमावलीय असं मला वाटत आहे. तसेच निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, अशी त्यांनी यावेळी म्हटले.