आसाममध्ये 644 आतंकवाद्यांनी 177 ‘घातक’ हत्यारांसह केलं आत्म’समर्पण’

गुवाहाटी : वृत्तसंस्था – गुरुवारी आसाममधील आठ बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांमधील एकूण ६४४ अतिरेक्यांनी १७७ शस्त्रे घेऊन शरणागती पत्करली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. हे अतिरेकी उल्फा (आय), एनडीएफबी, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआय (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबीचे सदस्य आहेत. या दहशतवाद्यांनी गुवाहाटी येथील कार्यक्रमात आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले.

पोलिस महासंचालक ज्योती महंत यांनी पत्रकारांना सांगितले की, हा दिवस राज्य आणि आसाम पोलिसांसाठी महत्त्वाचा आहे. एकूण ६४४ कार्यकर्त्यांनी आणि आठ दहशतवादी संघटनांच्या नेत्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ते म्हणाले की, अलिकडच्या काळात दहशतवाद्यांचे हे सर्वात मोठे आत्मसमर्पण आहे. या दहशतवाद्यांकडून एके-४७ आणि एके-५६ अशी अनेक शस्त्रे देण्यात आल्याचे महंतांनी पुढे सांगितले. आसामसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे.

डिसेंबरमध्ये २४० हून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले
त्याआधी, १ डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की ८ डिसेंबरपासून मागील तीन आठवड्यांमध्ये २४० हून अधिक अतिरेक्यांनी आसाममध्ये आत्मसमर्पण केले. यावेळी त्यांनी सांगितले होते की गेल्या दशकात दक्षिण आसाम, मिझोरम आणि उत्तर त्रिपुरामध्ये अपहरण करण्यासह हिंसक आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये दहशतवादी गुंतले आहेत.

 १५० तोफा आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जमा-
ही माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की ८ डिसेंबरपासून दक्षिणेकडील आसाममधील करगंज आणि हैलकांडी जिल्ह्यात २४२ स्थानिक आदिवासी अतिरेकींनी आसाम रायफल्स आणि आसाम पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. विविध संघटनांशी संबंधित असलेल्या या अतिरेक्यांनी वेगवेगळ्या १५० प्रकारच्या बंदुका आणि मोठ्या प्रमाणात दारू गोळा जमविला. यात चार एके सीरीज रायफल, एक चिनी रायफल, तीन एम -२० पिस्तूल आणि ११० मिश्रित शस्त्रे आहेत.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या तीन वर्षांत पोलिस आणि जिल्हा अधिकारी या अतिरेक्यांशी संवाद साधत आहेत. सध्या सुरू असलेल्या वाटाघाटीचा भाग म्हणून बंडखोरांनी आपली शस्त्रे जमा केली आणि मुख्य प्रवाहात परत आले. त्यांचे हिंसक आणि गुन्हेगारी कारवाया देखील थांबविण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा –