तबलिगी जमात संबंधित 2200 विदेशी नागरिकांवर कारवाई, 10 वर्षापर्यंत भारतात ‘नो-एन्ट्री’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तबलीघी जमात कार्यात सामील झाल्यामुळे केंद्र सरकारने 2200 परदेशी नागरिकांना 10 वर्षांसाठी भारतात येण्यास बंदी घातली आहे. हे लोक पर्यटक व्हिसावर भारतात येत धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत होते. आता हे नागरिक पुढील 10 वर्षे भारतात येऊ शकणार नाहीत. माहितीनुसार हे नागरिक पर्यटक व्हिसावर भारतात आले होते आणि तबलीघी जमात कार्यक्रमात सहभागी झाले होते. या नागरिकांना व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 10 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.
या देशांमधील नागरिकांना टाकले ब्लॅक लिस्टमध्ये
मिळालेल्या माहितीनुसार, 2200 विदेशी लोकांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले, त्यात नायजेरिया, माली, म्यानमार, थायलंड, टांझानिया, केनिया, श्रीलंका, जिबूती, यूके (ओसीआय कार्डधारक), दक्षिण, आफ्रिका, बांगलादेश ऑस्ट्रेलिया आणि नेपाळमधील नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांवर आरोप आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी बेकायदेशीरपणे गर्दी जमविली, ज्यामुळे विषाणूचा झपाट्याने प्रसार झाला आणि त्यानंतर बऱ्याच राज्यांतील लोकही या घटनेच्या चपळ्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात, जवळजवळ एक तृतीयांश लोक आणि 17 राज्यांत संसर्ग हे संक्रमण पसरले आणि बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला.
960 blacklisted foreign nationals banned for 10 years from travelling to India for their involvement in Tablighi Jamaat activities: Government sources pic.twitter.com/W5X6e6TU4y
— ANI (@ANI) June 4, 2020
निजामुद्दीन मरकझमध्ये जमले होते हजारो लोक
15 मार्चच्या सुमारास देशात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्यासोबतच लॉकडाउनही जारी करण्यात आले होते, परंतु दिल्लीत कलम 144 लागू झाल्यानंतरही हजारो जमाती अनेक दिवस तबलीघी मरकझ, हजरत निजामुद्दीन येथे जमा झाले. या काळात अनेक कथित ऑडिओदेखील आले, ज्यात हजरत निजामुद्दीन स्थित तबलीघी मरकझचे प्रमुख मौलाना सद असे म्हणत होते की, कोरोना व्हायरसला घाबरून जाण्याची गरज नाही. निजामुद्दीन मरकझमध्ये तबलीघी जमातमधील लोक एकत्र आल्यामुळे देशात कोरोनाची अनेक प्रकरणे समोर आली होती. वेगवेगळ्या राज्यात गेल्यामुळे या कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला आणि त्यानंतर मौलाना साद यांच्यावरही टीका झाली. ते अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाहीत. या प्रकरणात, दिल्ली पोलिसांनी गेल्या गुरुवारी साकेत कोर्टात 12 नवीन आरोपपत्र दाखल केले, ज्यात 541 परदेशी नागरिकांवर आरोप ठेवले गेले. पोलिसांनी आतापर्यंत एकूण 47 आरोपपत्र दाखल केले आहेत ज्यात 900 हून अधिक जमातींवर आरोप ठेवले गेले आहे.