सरकारनं उज्ज्वला योजने अंतर्गत LPG सिलेंडर वाटपाच्या नियमांमध्ये केले बदल, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – पंतप्रधान उज्ज्वला योजनेत (PMUY)मोफत एलपीजी सिलिंडर वितरणाचे धोरण सरकारने बदलले आहे. या योजनेंतर्गत कोरोना महामारी दरम्यान सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत गरीबांना तीन महिन्यांसाठी मोफत एलपीजी सिलिंडरचे वितरण करण्याचा निर्णय घेतला होता.

या योजनेंतर्गत एप्रिल आणि मेच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत लाभार्थींच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) अंतर्गत आगाऊ निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता जेणेकरुन त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागू नये. सरकारने जून महिन्यासाठी हे धोरण बदलले आहे. आता लाभार्थ्याला आधी एलपीजी सिलिंडरची किंमत जून महिन्यासाठी स्वत: भरावी लागेल आणि ही रक्कम नंतर सरकार त्यांच्या खात्यात टाकतील. कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान गरिबांचे कष्ट कमी करण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली होती. यामुळे उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदणीकृत लोकच त्याचा फायदा घेऊ शकले.

या योजनेंतर्गत 14.2 किलोचे तीन एलपीजी सिलिंडर आणि 5 किलोचे 8 एलपीजी सिलिंडर देण्याची तरतूद होती. महिन्याभरात 14.2 किलो सिलिंडर द्यावे लागले. ही योजना यशस्वी करण्यासाठी 1000 एलपीजी वितरकांशी भेट घेऊन लाभार्थ्यांना वेळीच सिलिंडर मिळावेत याची खात्री केली गेली. सरकारने या योजनेंतर्गत 24 कोटी एलपीजी सिलिंडरचे वितरण करण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु हे लक्ष्य पूर्ण केले जाणार नाही. 20 मे पर्यंत केवळ 6.8 कोटी सिलिंडरचे वितरण झाले. या वेगानुसार, जूनअखेरपर्यंत 15 कोटींपेक्षा कमी एलपीजी सिलिंडर वितरित होणे अपेक्षित आहे.