भारताचा मोठा विजय ! पूर्व लडाखमधील अनेक जागांवरून अडीच किलोमीटर मागं हटलं चीन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लद्दाख एलएसीवर गतिरोध संपवण्यासाठी भारतीय मुत्सद्देगिरीचा मोठा परिणाम समोर आला आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने अनेक ठिकाणे सोडली आहेत. मात्र हा उपक्रम दोन्ही बाजूंकडून दिसून येत आहे. सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, गलवन प्रदेशात पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) पेट्रोलिंग पॉईंट १५ आणि हॉट स्प्रिंग्ज क्षेत्रापासून अडीच किलोमीटर मागे हटली आहे, तर भारताने आपल्या काही सैनिकांना मागे घेतले आहे. यापूर्वी ४ जून रोजीही अशी बातमी आली होती की, चिनी सैन्य दोन किलोमीटर मागे हटले आहे. चीनने हे पाऊल ६ जून रोजी लेफ्टनंट जनरल स्तराच्या बैठकीपूर्वी उचलले होते.
India and China disengage at multiple points in Eastern Ladakh. Troops and infantry combat vehicles moved back by 2.5 km by People’s Liberation Army in Galwan area, Patrolling Point 15 and Hot Springs area. India has also moved some of its troops back: Top Govt Sources to ANI pic.twitter.com/2wIrBm67HD
— ANI (@ANI) June 9, 2020
कालच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, सध्या देशाचे नेतृत्व मजबूत हातात आहे आणि देशाच्या स्वाभिमानावर गदा येऊ देणार नाही. ते असेही म्हणाले होते की, भारत आणि चीन सद्यस्थितीतील गतिरोध सोडवण्यासाठी लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर बोलणी करत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. तर चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनईंग म्हणाल्या होत्या की, दोन्ही बाजू मान्य झाल्या आहेत कि त्यांना आपल्या वरिष्ठ नेत्यांमधील सहमतीला लागू करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून गतिरोध वादात बदलू नये.
उल्लेखनीय आहे की, लडाखच्या पांगोग त्सो झील, गलवन व्हॅली आणि डेमचोक ही तीन ठिकाणे होती जिथे भारतीय आणि चिनी सैन्य एकमेकांच्या समोर उभे होते. यापूर्वी सैन्य अधिकाऱ्यांच्या स्तरावर झालेल्या चर्चेत भारताने स्पष्ट केले होते की, चीनी सैन्य क्षेत्रातील पूर्वीचे स्थान पूर्ववत करेपर्यंत ते तेथून आपले सैन्य हटवणार नाहीत. चुशुल सेक्टरसमोर चीनच्या मोल्डो सैन्य तळावर झालेल्या या बैठकीत भारताचे नेतृत्व लेह येथील लष्कराच्या १४ व्या कोर्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले. त्यांच्यासह ब्रिगेडियर स्तराचे दोन अधिकारी देखील होते.