Lockdown : रेल्वेच्या बाबतीत 11 पध्दतीने चूकीची माहिती पसरवली गेल्याचं स्पष्ट, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी सांगितले की, रेल्वे सेवा सुरू होण्याबाबत चुकीची माहिती पसरविण्यासाठी 11 वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या गेल्या आणि प्रवासी कामगार एकत्र येण्याचे हे एक कारण होते. या घटनांच्या संदर्भात एफआयआर नोंदविण्यात आली असून योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल.
देशमुख पुढे म्हणाले की, 14 एप्रिल 2020 पासून ट्रेन सूरू होणार असल्याच्या चूकीच्या अफवा पसरविण्यासाठी 11 वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग केला गेला. ज्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी पसरली आहे त्याचा शोध लागला आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदविला जात असून त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच राज्य सरकार अशा अफवा अजिबात खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान मंगळवारी दुपारी 1000 हून अधिक प्रवासी कामगार उपनगरी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर जमले. ते सर्व त्यांच्या गावी जाण्यासाठी परिवहन सेवांची मागणी करीत होते. दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी असा दावा केला आहे की महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन पाहता स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात पाठविण्यास तयार आहे परंतु संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री त्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत.
लॉकडाऊनमध्ये वांद्रे स्थानकावर गर्दी जमा करणार्या व्यक्तीला अटक, आतापर्यंत 3 एफआयआर दाखल खान यांचे हे विधान मंगळवारी वांद्रे येथे स्थलांतरित मजुरांच्या जमलेल्या पार्श्वभूमीवर आले आहे. यातील बहुतांश मजूर बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील होते. त्यांनी मुंबई व आसपासच्या भागातील स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली, ज्यातील कॉंग्रेस एक घटक पक्ष आहे.
माजी राज्यमंत्री म्हणाले, ज्या ज्या मंत्र्यांशी मी स्थलांतरित कामगारांच्या समस्येवर चर्चा केली होती त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यास तयार आहे. परंतु त्या राज्यांचे मुख्यमंत्री स्थलांतरित मजूरांना स्वीकारण्यास तयार नाहीत, जिथे ते राहतात.