नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर अनेक व्यक्ती आपले जन्मगाव आणि कर्मभूमीला विसरून जातात. त्याचबरोबर पुन्हा लवकर ते कधीही त्या गावात परत जात नाहीत. मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव या सर्व गोष्टींना अपवाद ठरले आहेत. त्यांनी आपल्या जन्मगावातील नागरिकांचे आभार मानत त्यांना एक मोठी भेट दिली आहे. चिंतामडका हे मुख्यमंत्र्यांचे गाव असून या गावातील लोकांचे आभार मानण्यासाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी चिंतामडका या गावातील नागरिकांचे आभार मानत प्रत्येक घरात १०-१० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. या गावात एकूण २००० कुटुंब राहत असून प्रत्येक घरात हि रक्कम दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीने त्यांना हि रक्कम देण्यात येईल. त्यांनी हि रक्कम मंजूर करताना म्हटले कि,मी या गावातील लोकांचा आभारी असून त्यांचे फार मोठे उपकार माझ्यावर आहेत. या गावात राहणाऱ्या प्रत्येक घरात हि रक्कम दिली जाणार असून माझा जन्म या गावात झाला होता.
दरम्यान, मुख्यत्र्यांनी हि रक्कम देण्याची घोषणा करण्याबरोबरच तात्काळ हि रक्कम गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
- नारळाच्या तेलाने काढा मेकअप ; जाणून घ्या, नैसर्गिक मेकअप ‘रिमूव्हर्स’
- ‘हे’ ७ पदार्थ सर्वात ‘हानिकारक’, यामुळे होऊ शकते आरोग्य ‘खराब’, जाणून घ्या
- कोणत्या पदार्थांमुळे कोणती ‘अॅलर्जी’ ? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय
- त्वचा आणि दातांसाठी घातक ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या कोणते
- ‘यांना’ कॉल केल्यावर तणाव कमी, जाणून घ्या