Weather Forecast : मुसळधार पावसासह पडणार ‘गारपीट’, हवामान विभागानं जारी केला ‘या’ 6 राज्यांसाठी ‘अलर्ट’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अलीकडेच शिवरात्रीच्या दिवशी हवामानात बदल झालेला दिसत होता, परंतु त्याआधीही आणि आता त्यानंतरही जास्तीचे ऊन पाहायला मिळत आहे. फेब्रुवारीचा महिना सुरू आहे आणि आतापासूनच सूर्याने आग ओकणे चालू केल्याने लोकांना उष्णता जाणवू लागली आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की जर ही परिस्थिती उन्हाळा सुरु होण्याच्या आधीच असेल तर पुढील महिन्यात काय होईल. हवामान खात्याचे म्हणणे आहे की काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांसाठी काही राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
यामध्ये सांगण्यात आले आह की बिहार, ओडिशा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे मुसळधार पावसासह हिमवृष्टीचा अंदाज वर्तविला गेला आहे. त्याचबरोबर 28-29 फेब्रुवारी च्या दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याशिवाय धुके आणि विजांचा कडकडाट याबाबत देखील इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊया प्रत्येक राज्याची स्थिती…
छत्तीसगड मध्ये ऑरेंज अलर्ट
रात्रभर रायपूरसहित प्रदेशाच्या अनेक भागात जोरदार गारपीठ आणि पाऊस झाला. भोर येथे पाऊस थांबल्यानंतर सकाळी 6 वाजता पुन्हा हलक्या सरी कोसळल्या. सध्या तिथे ढगाळ वातावरण असून दिवसभर पाऊसजन्य परिस्थिती आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दक्षिण छत्तीसगड भागात चक्रीवादळ 900 मीटरवर आहे. दुसरे चक्रीवादळ दक्षिण पश्चिम मध्य प्रदेशातून 1.5 किमी वर आहे. चौथे चक्रीवादळ पूर्व उत्तर प्रदेशातून 0.9 किमी वर आहे. यासह, मध्य छत्तीसगडमधील पूर्व आणि दक्षिण प्रणाली एकत्र झाल्याने संपूर्ण उत्तर आणि मध्य छत्तीसगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे भाजीपाला पिकांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गारपीट व पावसामुळे गहू व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ होईल.
छत्तीसगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केले असून हवामान विभागाने उत्तर छत्तीसगड अंबिकापूर, सरगुजा, बस्तर, कोंडागाव, जशपूर, बेमेतरा, कवर्धा आणि पेंड्रा येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
झारखंडमध्ये हवामान बदलले
झारखंडमध्ये पुन्हा एकदा हवामान बदलले आहे. पावसामुळे थंडी आणि कनकणीही परतली आहे. पलामूमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती, इथल्या पर्वतांमध्ये हिमवृष्टी दिसून आली. जिल्हा मुख्यालय मेदनीनगर सहित चैनपूर, सतबरवा लेस्लीगंज ,पाटन इत्यादी भागात मंगळवारी पहाटे 7:45 च्या सुमारास अचानक ढग दाटल्याने रात्रीसारखं वातावरण झाले होते. यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. तसेच गारपीठ देखील झाली. हवामान केंद्र, रांचीनुसार बुधवारीही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दरम्यान ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा वाहणार आणि जोरदार पाऊस होईल.
बिहारमध्ये बदलला हवामानाचा अंदाज
बिहारमध्ये पुढील 48 तासांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. मंगळवारी अनेक भागात सकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला. यामुळे डाळीच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजधानी पटनासह जहानाबाद, वैशाली, गोपाळगंज, बक्सर, सीवान, पश्चिम चंपारण यासह अनेक जिल्ह्यामध्ये पहाटेपासून झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली असून लोकांना पुन्हा थंडीची चाहूल लागली आहे.
उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी
27 फेब्रुवारी रोजी राज्यभरात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. डोंगरांवर वितळलेल्या बर्फामुळे आणि थंड वाऱ्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी मैदानावर थंडी असते. त्याचबरोबर उत्तरकाशी येथे हलक्या पावसामुळे थंडी वाढली. हवामान केंद्राच्या विक्रम सिंह यांच्या म्हणण्यानुसार उत्तराखंडमधील हवामानाचे वातावरण तसेच राहील. पश्चिमी विक्षोभ पश्चिम उत्तर प्रदेशात पोहोचल्यामुळे उत्तराखंडमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर 27 फेब्रुवारीला पश्चिमी विक्षोभ हिमालयात पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील बर्याच भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.
दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात वाढ
अलीकडेच राजधानी दिल्लीतील हवामान चांगल्या स्थितीत होते, परंतु पावसाचा परिणाम संपताच दिल्ली-एनसीआरमधील तापमानात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. हवामान खात्याने सांगितले की, पश्चिमी विक्षोभ नसल्यामुळे येत्या काही दिवसांत उष्णता वाढेल.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यात जास्तीत जास्त 28, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकेल. शनिवारी पश्चिमी विक्षोभ सक्रिय असतानाही ढगाळ वातावरण असेल व हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ओडिशामध्ये यलो अलर्ट जारी
ओडिशाच्या बर्याच भागात 25 फेब्रुवारीपासून तीन दिवस जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामान खात्याने येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सहा जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने सांगितले आहे की, येत्या काही दिवसांत ओडिशाच्या बर्याच भागात जोरदार पाऊस पडेल. भुवनेश्वर येथील प्रादेशिक हवामान खात्याच्या कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान, किनारी जिल्हा, उत्तर किनारपट्टी व उत्तर आंतरिक भागात बर्याच भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.