अब ठोको ताली ! नवज्योत सिध्दू विरूध्द ‘पोस्टरबाजी’

मोहाली : वृत्तसंस्था – भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्याविरोधात ‘राजकारण कधी सोडणार’ अशा आशयाचे पोस्टर मोहालीत झळकले आहेत.
अमेठीतून राहुल गांधी हरले तर राजकारण सोडेन अशी वल्गना करणारे सिद्धू हे काँग्रेसमधील नेत्यांसाठीही डोकेदुखी ठरले आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशीच वाद ओढावून घेतल्यामुळे सिद्धू यांचे खातेही बदलण्यात आले आहे. त्यामुळे सिद्धू हे सध्या नाराज आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीवेळी एका प्रचारात अमेठीतून राहुल गांधी हरले तर राजकारण सोडेन अशी वल्गना करणाऱ्या सिद्धू यांना आता मोहालीत पोस्टरबाजीतून सवाल करण्यात येत आहे. अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवले आहे. त्यामुळे तेव्हापासूनच सिद्धू हे राजकारण कधी सोडणार अशी विचारणा केली जात आहे. या पोस्टरबाजीमुळे सिद्धू यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरु झाल्याची चर्चा आहे.

आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची