नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यावेळी काँग्रेस मंत्री नवज्योत सिंद्धूंनी पाकिस्तानशी बोलून वाद मिटवावा अशी भूमिका केली होती. त्यावर नेटकऱ्यांसह सर्व स्तरावरून सिद्धूंवर टीका करण्यात आली. त्यामुळे आता पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केली. त्यावर भारतातून आनंदच व्यक्त होत आहे. त्यावर सिद्धू काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सिद्धूंनी आता आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
लोहा लोहे को काटता है. आग आग को काटती है. सांप जब डंक मारता है तो उसका एंटीडोट विष ही है, असं ट्वीट सिद्धूंनी केले आहे. तसंच दहशतवाद्यांचा विनाश करणे गरजेचे आहे, असंही म्हटलं आहे.
तसंच भारतीय सैन्यदलाची वाहवा त्यांनी केली आहे. भारतीय वायुसेना की जय, असा जयघोषही त्यांनी यात केला आहे. सिद्धूंच्या या ट्वीटवर अनेकांनी साकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, पुलवामा हल्ल्याबद्दल सिद्धू यांनी पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा परिणाम म्हणजे सिद्धू यांना कपिल शर्माच्या कार्यक्रमातून त्याला बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर आता सिद्धूच्या ट्वीटवर अजून काय प्रतिक्रिया येतील हे पाहणे महत्त्वाचे आहे.
लोहा लोहे को काटता है,
आग आग को काटती है,
सांप जब डंक मारता है, उसका एंटीडोट विष ही है,आतंकियों का विनाश अनिवार्य है|
भारतीय वायु सेना की जय हो @IAF_MCC
जय हिन्द 🇮🇳 जय हिन्द की सेना 🇮🇳— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) February 26, 2019
#Surgicalstrike2 : 12 लढाऊ विमानं… फक्त 21 मिनिटं… आणि 300 दहशतवाद्यांचा खेळ खल्लास ?