पाटणा : वृत्तसंस्था – आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा गोत्यात आलेले माजी क्रिकेटर आणि पंजाब सरकारचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका संपता संपेनाअसे चित्र पाहायला मीळत आहे करण त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विरुद्ध मतदान करा, असं आवाहन त्यांनी मुस्लिमांना केलं आहे. त्यामुळे सिद्धू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांनी बिहारमधल्या कटिहारमधल्या प्रचारात मुस्लीम समुदायासमोर भाषण करताना हे वक्तव्य केलं. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
#WATCH Bihar:N Sidhu says in Katihar 'Main aapko chetavni dene aya hun Muslim bhaiyon,ye baant rahe hain apko,ye yahan Owaisi jaise logon ko la ke,ek nai party khadi kar aap logon ka vote baant ke jitna chahte hain.Agar tum log ikathe hue,ekjut hoke vote dala to Modi sulat jaega' pic.twitter.com/PQlIjm4oW2
— ANI (@ANI) April 16, 2019
निवडणुकीत षटकार मारा आणि मोदींना सीमेपार घालवा
तुम्ही अल्पसंख्यांक असूनही बहुसंख्य आहात. तुम्ही एकजूट दाखवली तर इथले उमेदवार तारिक अन्वर यांना कुणीही हरवू शकत नाही. तुमची संख्या इथे ६४ टक्के आहे. इथले मुस्लिम लोक हे आमची पगडी आहेत. तुम्हाला काही त्रास झाला तरी मला सांगा. मी पंजाबमध्येही तुम्हाला मदत करेन, असं आश्वासन सिद्धू यांनी दिलं.
कटिहारमधल्या बलरामपूर विधानसभा क्षेत्रात बारसोईमध्ये सिद्धू यांनी हे भाषण केलं. तुमची संख्या इथे ६४ टक्के आहे. इथले मुस्लीम लोक हे आमची पगडी आहेत. तुम्हाला काही त्रास झाला तरी मला सांगा. मी पंजाबमध्येही तुम्हाला मदत करेन, असं आश्वासन सिद्धू यांनी दिलं. भाजप आणि विरोधकांना लक्ष्य करत सिद्धू म्हणाले, हे लोक मतांची विभागणी करून जिंकू पाहतात पण तुम्ही सगळे एकत्र आलात तर मोदींचा पराभव होईल. या निवडणुकीत षटकार मारा आणि मोदींना सीमेपार घालवा, असंही ते म्हणाले.
तारीक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून १९ वर्षांनी काँग्रेसमध्ये परतले. त्यानंतर ते कटिहारमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा हा मतदारसंघ पश्चिम बंगालला जोडलेला आहे. याच मतदारसंघातून ते पाच वेळा खासदार झाले आहेत. त्यांच्या काँग्रेसच्या उमेदवारीमुळे आणि प्रचारामुळे कटिहार मतदारसंघ चांगलाच गाजतो आहे.