औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ आमदार भाजपामध्ये येण्यास उत्सुक आहेत. मात्र, त्यांना पक्षात घेताना सामाजिकक समीकरण व राजकीय परिस्थिती विचारात घेऊनच त्यांच्या प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद येथील एका कार्यकर्त्यात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आजी माजी आमदारांना आपल्या पक्षात ओढण्याची चढाओढ भाजपा आणि शिवसेनेत सुरु आहे. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले आहे.
असे असले तरी दानवे यांचे अजून राज्यातील राजकारणावर बारीक लक्ष आहे. त्यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ आमदार भाजपामध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या या वाक्याने कार्यक्रमातच एकच खळबळ उडाली.
त्यामुळे कार्यकर्त्यांना समजावून सांगताना ते म्हणाले, भाजपामध्ये सध्या सुरु असलेल्या इनकंमिगमुळे जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची काही एक गरज नाही. पक्षात कोणी आले तरी आपले काम एकनिष्ठेने सुरुच ठेवायचे असते. एक दिवस तुम्हाला नक्कीच न्याय मिळत असतो.
- वजन वाढू नये म्हणून महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान
- काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त ‘या’ पदार्थाचे करा सेवन
- कानात लपलेले असू शकतात ‘या’ ५ आजारांचे संकेत, कसे ओळखाल, जाणून घ्या
- सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी अवश्य करा ‘हे’ ५ उपाय
- हृदयरोग टाळण्यासाठी करा ‘हा’ जबरदस्त उपाय, २१ दिवसात पडतो फरक
- विविधि फुलांमध्ये सुध्दा असतात औषधी गुणधर्म, ‘हे’ रामबाण उपाय जाणून घ्या
- खुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे
- उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय, अवश्य करा
- महिलांनी ‘या’ हार्मोनल असंतुलनाच्या संकेताकडे करु नये दुर्लंक्ष, अन्यथा होतील दुष्परिणाम