अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे श्रीरामपूर येथे पत्रकारांशी बोलत असताना पक्षाला सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पत्रकारांवरच चिडले. जवळचे कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ लागल्यामुळे त्यांचा आज संयम सुटला.
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार हे आज श्रीरामपूर दौऱ्यावर आहेत. दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पक्षातील कार्यकर्ते, पवार यांच्या जवळ असलेले नेतेही पक्ष सोडून जात असल्याच्या बाबीकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. तुमचे नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारताच शरद पवार यांचा संयम सुटला. ते उभे राहून पत्रकारावर चिडले. माफी मागण्यास सांगू लागले. मात्र काही वेळाने वातावरण शांत झाले व त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. काही दिवसांपासून पवार यांचे नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधताच पवारांचा संयम सुटला. पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्यामुळे पवार चिंतेत आहेत. त्यातच आज पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांचा संयम सुटला.
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा