धनंजय मुंडे भरसभेत गहिवरले, म्हणाले – ‘माझ्या अंगावरच्या कातडयाचे जोडे काढून जरी घातले तरी…’

पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. काही कालावधीनंतर त्या महिलेने स्वतःहुन तक्रार मागे घेतली. ही तक्रार मागे घेतल्याने मुंडे याना दिलासा मिळाला आहे. तसेच धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde ) झालेलया आरोपावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. या नंतर विरोधकाना याचे चोख उत्तर मिळाल असेल. असे राष्ट्रवादीच्या नेत्याकडून सांगितलं जात आहे.

मंत्री धनंजय मुंडे हे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बीड व शिरुर कासार तालुक्यांच्या दौऱ्यावर होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं मोठं स्वागत करण्यात आलं. जेसीबीमधून धनंजय मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, जिथे जाईल तिथे लोकांचे प्रेम, गावोगाव स्वागत-सत्कार अनुभवून मी भारावून गेलो. तुम्हा सर्वांचे हे प्रेम आणि आशीर्वाद मला कोणत्याही संकटाशी तोंड द्यायची प्रेरणा देतात, असे त्यांनी उद्देशून सांगितले. शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोह येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ग्राम सचिवालयाचे धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी सर्व उपस्थितांशी संवाद साधला.

धनंजय मुंडे म्हणाले, कातड्याचे जोडे घातले तरी परतफेड होणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी अनेक समर्थकांचे आभार मानले. तर अशा कठीण प्रसंगी आपण सर्व माझ्या पाठिशी उभे राहिलात त्याबद्दल शब्दांत आभार मानू शकत नाही. पण एक सांगतो आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरच्या कातड्याचे जोडे काढून जरी घातले तरी होऊ शकत नाही. याची मला जाणीव आहे, असं सांगताना मुंडे हे भावनिक झाले होते. पुढे ते म्हणाले, आजपर्यंत अनेक संकटांना सामोरं गेलो. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करुन आज इथपर्यंत पोहोचलो आहे. जीवनात कधीच कोणाचं मन दुखावून नाही तर जिंकून स्थान निर्माण केलं आहे. आपलंही मन जिंकलंय म्हणून एवढं मोठं स्वागत केलं, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.