मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सेना भाजपचा काडीमोड झाल्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरु झाली आणि त्यानंतर कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार याचा देखील अंदाज वर्तवायला सुरुवात झाली. परळीतील घमासान निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाबाबत भाष्य केले आहे.
लाल दिव्यापेक्षा मतदारसंघातील प्रत्येक घरात विकासाचा दिवा लावायचे माझे स्वप्न आहे. मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्याला पीक विमा, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या जागा कमी होण्याऐवजी वाढल्या असल्याचे मत राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी व्यक्त केले होते. इतर पक्षांच्या विधानसभेच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी सध्या राज्याच्या राजकारणात किंगमेकर ठरलेली आहे.
निवडणुकीनंतर प्रथमच कार्यकर्त्यांशी परळीतील हालगे गार्डन येथे संवाद साधला.लाल दिव्यापेक्षा मतदारसंघातील प्रत्येक घरात विकासाचा दिवा लावायचे माझे स्वप्न आहे.मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्याला पीक विमा, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. pic.twitter.com/Xqw2U0dIVI
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 18, 2019
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच
मुख्यमंत्री पदावरून सेना भाजपमध्ये काडीमोड झाला असल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तिकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने संसदेत पवारांच्या राष्ट्रवादीचे कौतुक केले आहे. यामुळे आता कमी जागा असूनही सत्ता स्थापनेसाठी शरद पवार हे किंगमेकर ठरताना दिसत आहेत. मात्र शरद पवार नेमकं कोणासोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Visit : Policenama.com
- ‘या’ व्यायाम प्रकाराने लाभते दिर्घायुष्य, जाणून घ्या 5 आरोग्यदायी फायदे
- सतत ‘एनर्जी ड्रिंक’ घेतल्याने कमी होते मेंदूची कार्यक्षमता, ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा
- हिवाळ्यात ‘हे’ 6 आजार ठरू शकतात त्रासदायक, ‘हे’ उपाय आवश्य करा
- योगासने सुरु करण्यापूर्वी आणि नंतर ‘ही’ काळजी घ्या, लक्षात ठेवा ‘या’ 6 गोष्टी
- ‘हे’ आहेत थंड पाण्याचे 5 दुष्परिणाम आणि गरम पाण्याचे तब्बल 14 फायदे
- गुलाबी थंडीत असे सांभाळा तुमचे आरोग्य, ‘हे’ 7 पदार्थ आवश्य सेवन करा
- वजन घटवण्यासाठी ‘या’ 7 टिप्स, केवळ दररोज चालण्याने जळतील 500 कॅलरीज !