नाथाभाऊ यांच्यानंतर खा. रक्षा खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून खा. रक्षा खडसे यांचे ‘कौतुक

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) यांनी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतक-यांना न्याय मिळावा यासाठी ठाकरे सरकार विरोधात सोमवारी (दि. 9) आंदोलन करणार आहेत. खा. खडसे यांच्या या आंदोलनाच्या भूमिकेचे राष्ट्रवादीने समर्थन केले आहे. खडसे या भाजपच्या खासदार असल्या तरी केळी उत्पादकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्या भूमिका मांडत आहेत. त्यात वावग काय ? असा सवाल करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ त्यांची स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करतात की काय, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपची सुमारे 40 वर्षांची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंच्या पाठोपाठ त्यांची कन्या रोहिणी खेवळकर-खडसेही (Rohini Khevalkar-Khadse) यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीत आल्यानंतर एकनाथ खडसे यांना पक्षाने विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी केली आहे. राज्यपालांकडे पाठवलेल्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव देखील आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी सावर्डे येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (BJP Leader Chandrakant Patil) पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. घरात बसून चंद्रकांतदादांनी यांनी ट्वीट करून काय भूमिका व्यक्त केली, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काही आवश्यकता आहे, असे वाटत नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजाचे आरक्षण टिकावे यासाठी, आम्ही प्रयत्न करत असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई का झाली, याचा अभ्यास भाजपने केलेला दिसत नाही, असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी आमची शिफारस यादी राज्यपालांकडे (Maharastra Governor) दिली आहे. राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला आहे.

… त्यांची नाराजी दूर करू
आमदारकीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज असणे स्वाभाविक आहे, पण त्यांची नाराजी आम्ही दूर करू, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.