जागतिक निद्रा दिनाचा योग साधत जयंत पाटलांनी केलं ‘असं’ ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जागतिक झोप दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत जयंत पाटील यांनी टि्वट करीत केंद्र सरकारची खिल्ली उडवली आहे. शेतकरी आंदोलनात जवळपास ३०० च्यावर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत… तरुण रोज नोकरी गमावत आहेत… दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे… अशा प्रश्नांची सरबत्ती जयंत पाटील यांनी केली आहे.

ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, की शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत, तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?