‘मोदींच्या रूपात हिटलरचा पुनर्जन्म’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान मोदी यांच्या स्वरुपात हिटलरचा पुनर्जन्म झाला असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोगन करण्यात आले होते, तेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष केले.

जितेंद्र आव्हाड यांनी सवाल केली की मुस्लीम समाजाचं नाव पुढे करून हिंदूंना गाफील ठेवण्याची ही नीती आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुरु असलेली ही मोठी लढाई आहे. आजही आसाममधील 14 लाख हिंदूंकडे कागदपत्रे नाहीत. आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या अनेक परिवारांकडे, भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांकडे जुने पुरावे कोठून येणार ? नरेंद्र मोदी यांच्या रूपात हिटलरचा पुनर्जन्म झाला असून लवकरच सोशल मीडियासाठीही कायदा लादला जाणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले की तुम्ही कोणासोबत फोटो काढले, कोणासोबत संभाषण केले हे देखील त्यांना कळणार आहे. दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची त्यांना सवय आहे. देशात आता दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची वेळ आली आहे आणि आता गोळवलकर विरुद्ध गांधी असा विचार आहे. समाजाला विभक्त करण्याचे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व समाजाला एकत्रित लढण्याची गरज असल्याचेही आव्हाड म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/