राम कदमांची अवस्था कावीळग्रस्तासारखी, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या ट्विटनं ‘खळबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्याने, सत्तेवरून पायउतार झालेल्या भाजपचे नेते महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजपचे आमदार राम कदम यांनी आगामी अधिवेशनावरुन सरकारवर ट्विटवरून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे. राम कदमांना सगळीकडे पिवळं दिसतंय याची अवस्था कावीळीग्रस्तासारखी झाली असल्याचा टोला मलिकांनी लगावला आहे.

राम कदमांचा समाचार घेताना म्हणाले आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्यं करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत, असा टोला मलिक यांनी कदमांना लगावला. तर विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करायचे प्रश्न 30 दिवस आधी देणे अपेक्षित असते. विधानसभा गठीत झाल्यानंतर तीस दिवसांचा अवधी मिळाला नसल्याने ते प्रश्न विचारू शकत नाहीत. मात्र सदनात लक्षवेधीद्वारे आमदारांना प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात, अशी माहिती त्यांनी राम कदमांना करून दिली.

कामकाज सल्लागार समितीच्या अजेंड्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याला सर्व पक्षांचे गटनेते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे. त्यामुळे कावीळ झालेल्यांना सगळ जग पिवळं दिसतं, तशीच अवस्था राम कदम यांची झालेली दिसतेय, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/