‘अशी इश्क के इम्तिहां और भी है…’, नवाब मलिकांनी संजय राऊतांना सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केलेले आहे. मात्र आघाडीमध्ये असलेले वैचारिक मतभेद समोर येताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानावर शिवसेनेने आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी आता अशा अनेक गोष्टीचा सामना करावा लागणार आहे असे संजय राऊत यांना म्हंटले आहे.

नवाब मलिक यांनी याबाबत प्रसिद्ध शायर इकबाल यांची शायरी ट्विट करत संजय राऊत यांना टॅग केले आहे. यामध्ये नवाब मलिक म्हणतात, सितारों के आगे जहाँ और भी हैं, अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं. संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर मत व्यक्त करताना राहुल गांधी यांना सावरकरांबाबत माहिती द्यायला हवी असे म्हंटले होते. तसेच सावरकर हे देखील संपूर्ण देशाचे असून त्यांनी देखील गांधी आणि नेहरूंप्रमाणे आपले योगदान दिलेले आहे असे संजय राऊत म्हणाले होते.

काय म्हणाले होते राहुल गांधी
माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे त्यामुळे केलेल्या विधानाबाबत मी माफी मागणार नाही अशी गर्जना राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर केली. काँग्रेसने सुरु केलेल्या भारत बचाव रॅली या आंदोलनादरम्यान राहुल गांधी बोलत होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/