आजोबा शरद पवार यांच्या वक्तव्यावर पार्थ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशात सिंह राजपूत प्रकरणाची चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवारांना आजोबा शरद पवार यांनी चांगलेच झापले आहे. यावर पार्थ पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, ते अपरिपक्व आहेत. असे सांगून पार्थ नातवाला जाहीरपणे फटकारले.

यानंतर पार्थ पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. पवार साहेब बोलले त्यावर मला आता कोणतेही भाष्य करायचे नाही, असे म्हणत पार्थ पवार यांनी आजोबांच्या वक्तव्यावर बोलणे टाळले. तसेच सुशांत सिह राजपूत प्रकरण आणि शरद पवार यांच्या वक्तव्यावर विनाकारण मला नवीन कोणतेही वक्तव्य करायचे नाही, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले शरद पवार ?
पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, ते अपरिपक्व आहेत. सीबीआयबाबत जे बोलले आहेत तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही, असे शरद पवार म्हणाले. याचबरोबर मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांना 50 वर्षे ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असे पवार यांनी सांगितले.