‘फडणवीस-ठाकरे’ वादात ‘राष्ट्रवादी’ची उडी, अमृता फडणवीसांवर ‘खोचक’ टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सत्तापालट झालाय. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आता उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेनही प्रतियुत्तर दिले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे की, ‘काहीही वक्तव्य करून प्रकाशझोतात येण्याचा निष्फळ प्रयत्न सध्या अमृता फडणवीस या करत आहेत. पण त्यांनी आता शब्दांना आवर घालून अशी वक्तव्य करणं टाळायला हवं. मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीही योगदान दिलेलं नाही. मात्र आता वैफल्यग्रस्त मानसिकतेतून त्या आरोप करत आहेत. त्यांनी आता माजी मुख्यमंत्र्यांना धीर द्यायला हवा,’

‘गेल्या ५ वर्षात आपण महाराष्ट्राला आपल्यावर टीका करण्यासाठी अनेकदा संधी दिली. पण शिवसेनेने कधीही वैयक्तिक टीका केली नाही. कारण आपण राजकारणात नव्हतात. आता जर तुम्हाला कंठ फुटला असेल तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा. देवेंद्र फडणवीस यांचे पण हेच मत असल्याचे समजते,’ असा खोचक टोला युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांना लगावला होता. भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांची ट्विटरवरची सक्रियता जास्तच वाढली असून त्यांनी आता थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/