भाजपच्या कीर्तनात ‘राम’, वर्तनात ‘रावण’ ; ‘त्या’ घटनेवरून राष्ट्रवादी ‘संतप्त’
मुंबई : वृत्तसंस्था – भाजपच्या कीर्तनात राम ; पण वर्तनात मात्र रावण अशा शब्दात राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधून गुजरातमधील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला आमदाराकडून झालेल्या मारहाणीबद्दल संताप व्यक्त केला आहे.
गुजरातच्या नरोदामध्ये भाजपा आमदाराने @NCPspeaks च्या कार्यकर्त्या नीतू तेजवानी यांना केलेल्या मारहाणीचा तिव्र निषेध.महिलांचे सक्षमीकरण सशक्तीकरणावर भाषणं देतांना @BJP4India चे नेते थकत नाहीत.बेटी बचाओ चा नारा देणारे @PMOIndia या आमदारावर काय कारवाई करतात ते बधायचयं @smritiirani pic.twitter.com/zfVDndmCrn
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 3, 2019
गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजप आमदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राष्ट्रवादीने संतप्त भूमिका घेतली आहे. भाजपवर निशाणा साधताना भाजपच्या किर्तनात राम आणि वर्तनात रावण असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे.
भाजपाच्या कीर्तनात राम आणि वर्तनात रावण
बेटी बचाओ, बेटी पढाओ असा नारा देत सत्तेवर आलेले भाजपा सरकार स्त्रियांचा अवमान करण्यात अग्रेसर आहे. गुजरातमधील आमदाराकडे स्थानिक समस्या घेऊन गेलेल्या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यापर्यंत आता यांची मजल गेली आहे. pic.twitter.com/jIaCmkcuRa
— NCP (@NCPspeaks) June 3, 2019
नरोदातील कुबेरनगरमध्ये रहिवाशांच्या हक्कासाठी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या वॉर्ड प्रमुख नीतू तेजवानी यांना भाजप आमदार बलराम थवानींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा नारा देत सत्तेवर आलेले भाजप सरकार महिलांचा अवमान करण्यात अग्रेसर आहे. अशा शब्दात राष्ट्रवादीने टीकास्त्र सोडले आहे.
@NCPspeaks च्या गुजरात मधील नेत्या नितु तेजवानी यांना भाजपाचे आमदार बलराम थवानी यांनी स्थानिक समस्येबद्दल आवाज उठवला म्हणून अक्षरशः लाथांनी मारहाण केली. @narendramodi, हेच का तुमचे बेटी बचाव धोरण ? महिलांना मारहाण करणे म्हणजेच का 'पार्टी विद डिफ्रन्स' ? #Gujrat pic.twitter.com/zLPzHsycCm
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 3, 2019
गुजरातमधील आमदाराकडे स्थानिक समस्या घेऊन गेलेल्या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यापर्यंत आता यांची मजल गेली आहे. इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना अशी वागणूक देऊन जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचे काम भाजपकडून होत आहे असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. मोदी, हेच का तुमचं बेटी बचाव धोरण ? महिलांना मारहाण करणे म्हणजेच ‘पार्टी विथ डिफरन्स’ का ? असे सवाल त्यांनी केले आहेत.
या प्रकरणातील जखमी महिला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वॉर्ड प्रमुख आहेत. इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अशी वागणूक देऊन जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचे काम भाजपाकडून होत आहे. देशातील स्त्रीजातीचा अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांचा सत्तेचा माज उतरवण्याची आता गरज आहे.
— NCP (@NCPspeaks) June 3, 2019