IND vs NZ : टीम इंडियाचा नवा ‘संकटमोचक’ केएल राहूलनं झळकावलं शानदार ‘शतक’

माऊंट माउंगानुई : वृत्तसंस्था – भारत क्लीन स्वीपची नामुष्की टाळण्यासाठी भारत-न्यूझीलंड मधील असलेल्या तिसरा सामना खेळात आहे. यात न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताला प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात करता आली नाही. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संपूर्ण डाव सावरला. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुलने 104 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानं 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. भारताला या शतकाची गरज होती. त्याचबरोबर मनीष पांडेसोबत चांगली भागीदारीही करत आहे. सुरैश रैनानंतर, K. L राहुल दुसरा खेळाडू ठरला आहे, ज्याने ५ क्रमांकावर फलंदाजीस येऊन शतक पूर्ण केले. याअगोदर २०१५ मध्ये अशी कामगिरी रैनाने केली होती.

या अगोदर श्रेयस अय्यरने 62 धाव केल्या होत्या. अय्यर आणि राहुल या शतकी भागीदारी केल्यानंतर अय्यर बाद झाला. सध्या पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल रोहित शर्माच्या दुखापतीमुळं सलामीला फलंदाजी करत आहेत. यामध्ये मयंक अग्रवाल १ धाव करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली ९ धाव करून जेमिसनच्या हातात कॅच देत बाद झाला. न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही सामन्यात कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. कोहलीने गेले कित्येक महिने एकही शतकी खेळी खेळला नाही.

लॅथमच्या गोलंदाजीवर 2 धाव काढण्याच्या नादात पृथ्वी शॉ आऊट झाला. दुसरी धाव नसतानाही पृथ्वी धावला आणि बाद झाला. या सामन्यात पृथ्वी शॉ चांगली कामगिरी करेल, असे वाटत होते. मात्र त्याने स्वत:च्या हाताने विकेट टाकली. पृथ्वी शॉने भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र ४२ चेंडूत ४० धावा करून आऊट झाला. म्हणून पृथ्वी शॉची विकेट सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे.

३० वर्षांत वनडे मालिकेत टीम इंडियाला मिळाला नाही क्लीन स्वीप सध्याच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडविरुद्धच्या भारतीय संघ २-० ने पिछाडीवर आहे. १९९० नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय संघाला वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागणार आहे. इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३० वर्षांपूर्वी टीम इंडियाला ५-० असा पराभव पत्करावा लागला होता. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेनेही भारताकडून ४-० एकदिवसीय मालिका गमावली होती, परंतु त्यानंतर पावसामुळे पहिला वनडे सामना रद्द झाला होता.