नेटीजनवर आला बाळासाहेबांच्या अभिवादनाचा महापूर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदुह्रदयसम्राट अशी आपली ओळख निर्माण करून गेलेले शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी त्यांच्या स्मृती जपण्याचा आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न आज नेटीजनने केला आहे. एरव्ही आंबट जोक फॉरवर्ड करणाऱ्या नेटीजनने आज मात्र सकाळपासून आपल्या व्हाटस्अॅप समूहात आणि स्टेट्सवर बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजलीचा अक्षरश वर्षावच केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी हृदयाची प्रक्रिया बंद पडल्याने दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने उभा महाराष्ट्र हळहळला होता त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी १८ नोव्हेंबर २०१२ रोजी लाखोंचा जनसागर मुंबईच्या रस्त्यावर अवतरला होता. बाळासाहेब हे स्पष्ट आणि झंझावाती नेते असल्याने सामान्य लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दिवाने होते त्यांनी आयुष्यभर एक हि निवडणूक लढवली नसताना त्यांना लोकांनी दिलेले प्रेम हे शब्दात सामावणारे नाही त्यांच्या जाण्याने एक लोक नायक हरपल्याची भावना जनमानसात पसरली होती. अगदि तेव्हापासून आजपर्यंत बाळासाहेबांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न सर्व सामान्य लोक करत असतात.

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून  

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये  ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्या ठिकाणीही बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आजच्या दिवशी हजारो लोक एकत्रित येत असतात. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे त्याच प्रमाणे शिवसेनेचे असंख्य शिवसैनिक नेते आणि कार्यकर्ते शिवाजी पार्कच्या मैदानात एकत्र येत असतात. गतवर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हि बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर आले होते.

नेटीजनवर बाबासाहेबांच्या पुण्यस्मरणाबद्दल भरभरून लिहले जात आहे. बाळासाहेबांच्या जीवनाची किस्से, बाळासाहेबांवरील कवितांनी फेसबुकवर बाळासाहेबांच्या अभिवादनाचा अक्षरशः महापूर आल्याचे बघायला मिळते आहे. यावरूनच मराठी माणसाच्या मनात बाळासाहेबांबद्दल आजही अपार प्रेम आहे हे दिसून येते. माणूस देह रूपाने या जगाचा निरोप घेऊन गेला तरी माणसे त्याला आठवणींच्या रूपाने जिवंत ठेवतातच फक्त त्याचे कार्य समाजासाठी असले पाहिजे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यात त्यांनी केलेला संघर्ष आणि त्या संघर्षातून उभा केलेला समाज सर्व सामन्यांना भावतो. आज बाळासाहेब असते तर हे असं झालं असत, आज बाळासाहेब असते तर हे असं झालं नसत या बोलल्या जणाऱ्या वाक्यातून बाळासाहेबांचे महत्व राज्यांच्या राजकारणात किती होते या भावानेतून नेहमी व्यक्त होत राहते. त्याच भावनेचे एक रुप आपणाला आज नेटीजनमध्ये पाहायला मिळाले आहे.