दुर्देवी ! लग्नानंतर अवघ्या 16 व्या दिवशी अपघातात दाम्प्त्याचा मृत्यू, ट्रेलर कापून बाहेर काढले 11 मृतदेह
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्रेलर आणि पिकअप कारच्या झालेल्या अपघातात एकूण 11 जणांचा जागीत मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील सोईन्तरा गावात शनिवारी सकाळी घडली. या भीषण अपघातात पिकअप कार चक्काचूर झाली. अपघातात मृत झालेल्यांमध्ये 4 पुरुष 6 महिला आणि एक लहान मुलाचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठा ट्रेलर बाजूला सारुन जखमींना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात नवविवाहित दाम्पत्याचाही मृत्यू झाला. त्यांचा नुकताच विवाह झाला होता. त्यांच्यावर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात एक चमुकल्याचा देखील जागीच मृत्यूमुखी झाला. ट्विटवर वरुन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दु:ख व्यक्त केले.
Deeply saddened to learn about tragic accident on Balotra-Phalodi Mega Highway in Shergarh area,#Jodhpur in which 11 people have lost lives. My heartfelt condolences to those who lost their loved ones,may god give them strength to bear this loss. I wish speedy recovery to injured
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) March 14, 2020
हा अपघात इतका भीषण होता की ट्रेलर पूर्ण पिकअप कारमध्ये घुसला. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी पाहाणी केली त्यानंतर अक्षरश: हा भलामोठा ट्रेलर कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.