अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नगर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील शेतात पेरणी केली. त्यानंतर पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली. थोरात यांना युवकांचे प्रश्न माहित आहेत का, असा सवाल करून त्यांच्या युवकसंवाद कार्यक्रमाचा समाचार घेतला.
काल सायंकाळी ठाकरे हे संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे थांबले. शिवसेना तालुकाप्रमुख यांच्या विनंतीला मान देऊन आदित्य ठाकरे हे एक चांगले जाऊन त्यांनी पेरणी करण्याचा आनंद तसेच शेतकऱ्यांची संवाद साधला. येथून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे गेले.
शेतकऱ्यांना संबोधित करताना अदित्य ठाकरे म्हणाले नाही की, संपूर्ण कर्जमाफी ही शिवसेनेची भूमिका आहे. शेतकऱ्यांना विभाग जाणार नाही. राज्यातील जनतेशी, शेतकरी वर्गाशी आणि तरुणांशी होत असलेला संवाद महत्त्वाचा असून जनतेतून मिळणारे प्रेम ही शिवसैनिकांनी केलेल्या कामाची पुण्याई आहे. असेच प्रेम यापुढे शिवसेनेवर दाखवावे.
- नारळाच्या तेलाने काढा मेकअप ; जाणून घ्या, नैसर्गिक मेकअप ‘रिमूव्हर्स’
- ‘हे’ ७ पदार्थ सर्वात ‘हानिकारक’, यामुळे होऊ शकते आरोग्य ‘खराब’, जाणून घ्या
- कोणत्या पदार्थांमुळे कोणती ‘अॅलर्जी’ ? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय
- त्वचा आणि दातांसाठी घातक ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या कोणते
- ‘यांना’ कॉल केल्यावर तणाव कमी, जाणून घ्या