लग्न सोहळ्यातून तब्बत 25 तोळे चोरले, शहरात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर-औरंगाबाद रस्त्यावरील एनआर लॉन्स येथील एका लग्न सोहळ्यातून आज रात्री तब्बल पंचवीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत माहिती अशी की, नगर-औरंगाबाद रस्त्यावरील एनआर लॉन्स येथे आज रात्री लग्नसोहळा होता. या लग्नसोहळ्यात पाळतीवर असलेल्या टोळीच्या इशार्‍यावरून एका लहान मुलाने 25 तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग उचलून नेली. लग्न सोहळ्यातील वऱ्हाडी मंडळींची नजर चुकवून ही बॅग चोरून नेली.

काही वेळानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर लॉन्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक लहान मुलगा सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन जाताना दिसत आहे. या बॅगमध्ये तब्बल पंचवीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. तब्बल पंचवीस तोळे चोरीस गेल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com