आदित्य ठाकरेंनी चार दिवस खेड्यात घालवावेत ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा सल्ला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात जन आशीर्वाद यात्रा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी ग्रामीण भागात चार दिवस घालून ग्रामीण भाग समजून घ्यावा, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज दिला.

थोरात म्हणाले की, आदित्यने ग्रामीण भाग समजून घेत दौरे करायला हवेत. कॉलेज जीवनाचा आनंद घेण्याच्या काळात तो राजकारणात आला. तो तरुण आहे. त्याने राज्यात फिरले पाहिजे. निवडणुकीच्या काळात तो या परिस्थितीला सामोरा जातो आहे, ही चांगली गोष्ट आहे.

गेली पाच वर्षे भांडण करताना एकमेकांचे गळे धरणारे आता एकमेकांच्या गळ्यात पडलेले दिसतात. त्यांचे हे नाटक असते. सत्तेत कुणाला आणायचे हे ते नव्हे, जनता ठरवणार आहे, असा इशाराही थोरात यांनी दिला.

आरोग्यविषयक वृत्त –