लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. उद्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ पिंपळगावमधील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडले. शरद पवारांची सद्सदविवेक बुद्धी राहिली नाही. त्यांची बुद्धी ठिकाणावर राहिली नाहीये. ते मोदींवर टीका करत आहेत. आज भाजपा सरकारने कांद्याला अनुदान दिले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, या विरोधी पक्षातील नेते अभिमानाने सांगत आम्ही जेल मध्ये गेलतो म्हणून, खरे तर तुम्ही स्वतंत्र चळवळीसाठी जेल मध्ये गेले नव्हे तर, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेल मध्ये गेले होते. असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबल यांचे नाव घेता लगावला आहे.