गृहखात्यावरून वाद नाही, तर कोणी घ्यायला तयार होईना शरद पवार यांची टिपण्णी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रीपदावरून नाराज नाही. उलट गृहखाते हवे का, अशी विचारणा केली, परंतु कोणीच तयार होत नाही. त्यामुळे गृहखात्यावरून वादाचा विषयच नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

जि. प.चे. माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पवार आज नगरमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांश संवाद साधला. मंत्र्यांचा शपथविधी झाला, परंतु खातेवाटपास विलंब होत असल्याबाबत विचारले असता, पवार म्हणाले, आज संध्याकाळी किंवा उद्या खातेवाटप पूर्ण होईल. खातेवाटप किंवा मंत्रीपदावरून सरकारमधील कोणत्याच पक्षात कोणीच नाराज नाही. हे सरकार तीन पक्षांचे असल्याने मंत्रीपदाचे वाटप सर्वांना करावे लागले, हे सर्वजण जाणतात. त्यामुळे कोणीही नाराज नाही.

गृहमंत्रीपदाबाबत बोलताना मात्र त्यांनी कोणत्याही पक्ष नाव घेतले नाही. नगरमध्येही ज्या तालुक्याला अद्याप मंत्रीपद नव्हते, त्या राहुरी तालुक्याला राष्ट्रवादीने प्राधान्य दिले, असे पवार म्हणाले.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/