Loksabha2019 : ‘त्या’ पक्षाने ५०० रुपये देऊन मतदानापूर्वीच जबरदस्तीने बोटावर लावली शाई
लखनौ : वृत्तसंस्था – आपल्याला मतदान करावे, म्हणून मतदारांना पैसे वाटले जातात. त्यावर आरोपप्रत्यारोप प्रत्येक निवडणुकीत होत असतात. पण उत्तर प्रदेशातील चंदोली लोकसभा मतदार संघात वेगळाच प्रकार घडला आहे. तेथे मतदानापूर्वी आदल्या दिवशी त्यांच्या बोटावर जबरदस्तीने शाई लावून ५०० रुपये दिले गेले आहेत. भाजपाच्या लोकांनी हे केल्याचे या लोकांनी सांगितले.
Chandauli: Residents of Tara Jivanpur village allege ink was forcefully applied to their fingers & they were given Rs 500 y'day by 3 men of their village. Say, "They were from BJP&asked us if we'll vote for the party. They told us now you can't vote. Don't tell anyone." (18.05) pic.twitter.com/yICJKNPwdt
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 19, 2019
चंदोली लोकसभा मतदारसंघातील तारा जीवनपूर गावात हा प्रकार घडला आहे. अशाप्रकारे तिघे जण तक्रार करायला पुढे आले आहेत. त्यांनी भाजपाच्या लोकांनी आमच्या बोटावर जबदस्तीने शाई लावली असून आम्हाला ५०० रुपये दिल्याची पोलिसांकडे तक्रार केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत तिघे जण पोलिसांकडे आले असून मतदानाला सुरुवात होणे बाकी असल्याने त्यांची तक्रार दाखल करुन घेतली आहे. त्यामुळे ते मतदान करु शकतात. मात्र त्यांना फिर्याद दाखल करावी लागेल.