मध्यस्थी केल्याच्या रागातून मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – वाहनचालकांतील भांडणातील मध्यस्थी केल्याच्या रागातून तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करीत विटांनी मारहाण केली. नगर-पुणे रोडवरील कोठी येथे आज (दि.14) ही घटना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शाम मुरलीधर कांबळे (वय 30, रा.इंदिरानगर, केडगाव) हा त्याची मोटारसायकल क्रमांक एम.एच.16, बी.एन.6556 वरुन केडगावहून पराग बिल्डींगकडे जात असताना कोठी चौकात दोन वाहनांचा किरकोळ अपघात झालेल्या ठिकाणी ते थांबले. दोन्ही वाहनचालक आपआपसात भांडत असताना कांबळे याने मध्यस्थी करुन भांडव मिटवण्याचा प्रयत्न केला असता तेथील तीन अनोळखी इसमांनी ‘तू मध्ये का बोलतोस?’ असे म्हणून त्यांना धक्काबुक्की केली. कांबळे हे त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करीत असताना तिघांपैकी एकाने त्यांच्या डोक्यात विट मारुन त्यांना जखमी केले व अन्य दोघांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

मारहाण करताना ते एकमेकांना बिरजा व मोन्या या नावाने आवाज देत असल्याने याबाबतची चौकशी केली असता त्यांची नावे बिरजू उर्फ बिरजा राजू वाघ (रा.कोठी) व मोन्या साळवे असल्याचे समजले, असे फिर्यादीत कांबळे यांनी म्हटले आहे. त्यावरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
महिलांनो, नॅचरल ग्लो हवाय? मग अवश्य करा ‘हे’ उपाय
शाकाहारी पुरुष पार्टनरला करतात पूर्ण संतुष्ट
सौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता ‘हे’ आयुर्वेदिक उपाय