तब्बल ४७ वर्षांनंतर निळवंडे कालवे खोदाईचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बहुचर्चित निळवंडे धरणाच्या ० ते ३ किलोमीटर दरम्यान प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास जवळपास ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरुवात झाली. लाभक्षेत्रातील आवर्षण प्रवणभागात आनंदोत्सव साजरा झाला. पोलीस बंदोबस्तात काम सुरू झाले आहे.

मंगळवारी (दि.११) मंत्रालयात झालेल्या चर्चेनुसार निळवंडेचे कालवे प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तासह कालवे खोदण्यास सुरूवात झाली. निळवंडेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या पायथ्या-पासून ‘खोंडवस्ती ते तिटमेवस्तीपर्यंत’ तीन किलोमीटरपर्यंतचे कालवे खोदाईचे काम प्रगतीपथावर होते. शेतकऱ्यांनी आपआपल्या शेतातील भूईमूग, वालवडसारखी पिके काढून घेतली.

शेतकऱ्यांचा जवळपास सर्व विरोध मावळल्याचे चित्र होते. गेली दोन, चार दिवस निळवंडे धरण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. राखीव दलाचे १०० जवान तसेच स्थानिक पोलीस बुधवारपर्यंत होते. मुंबई येथे मंगळवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकर नवले, कैलास वाकचौरे, अशोक भांगरे, सुनीता भांगरे, डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यातील बहुतांश मागण्या या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे समजते.

पाटबंधारे-जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी दोन पोकलेन, चार टिप्पर, डंपर, जेसीबी आदींसह कालवे खोदाईच्या कामाला गती दिली. कृषी विभागाचे अधिकारी एल. एन. नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतात उभ्या असलेल्या पिकांचे पंचनामे केले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, कार्यकारी अभियंता भरत शिंगाडे, उपअभियंता मनोज डोके, रोहित कोरे, तहसीलदार मुकेश कांबळे व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख दिवसभर निळवंडे धरण परिसरात होते.

आरोग्यविषयक वृत्त –

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

योग्य काळजी घेतली तर ‘हा’आजार होणार नाही,तुम्ही राहा अलर्ट

किचनमधील ‘या’ ९ भाज्यांचा ‘व्हायग्रा’सारखाच परिणाम

शुद्ध रक्तपुरवठ्यासाठी (NAT)आधुनिक रक्ततपासणी आवश्यक