जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुरंदर तालुक्यातील वाल्हे, सुकलवाडी, बाळाजीची वाडी, राख, पिसुर्टी येथे दुष्काळी परिस्थितीत टॅंकरने पाणी घालून डाळिंब जगविले. श्रावण महिन्याच्या उपवासामुळे त्या डाळिंबांना चांगलाच भाव मिळून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत होते. मात्र दुसरीकडे त्यांच्या या कष्टावर आयता डल्ला मारणाऱ्या चोरांनी शेतकऱ्यांना हैराण केले आहे.
दिवसा छुप्या मार्गाने शेतात घुसून डाळींबाचे चोरी केली जात असून त्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यावरही यांच्यावर कारवाई होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसुर्टी येथील शेत जमिनीच्या गट नंबर १८४ मध्ये असणाऱ्या डाळिंबाच्या बागेत पहाटे साडेपाचच्या सुमारास पाच ते सहा चोरट्यांनी डाळिंबाची तोडणी सुरू केली होती. मात्र त्यांची चाहूल दीपक चोरमले यांना लागली. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी त्यांच्या दुचाकी (स्प्लेंडर एम एच ४२ ए एम ६५०२, बजाज डिस्कवर एम एच ११ बीटी ९१६८) तेथेच सोडून पळून गेले. याबाबत दीपक चोरमले यांनी वाल्हे पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली.
- केसांना रोज तेल लावणे असते लाभदायक, मिळते संपुर्ण पोषण, जाणून घ्या
- सावधान ! नेहमी स्वच्छ दिसणाऱ्या ‘या’ ५ वस्तू कधीच नसतात स्वच्छ, जाणून घ्या धोके
- वृध्दावस्थेत ‘या’ वेदना टाळायच्या असतील तर तारुण्यातच करा ‘पादोत्तानासन’
- ‘हे’ ५ पदार्थ चेहऱ्यावर लावण्याची करु नका चुक, त्वचा होऊ शकते खराब
- फळांची साल कधीही फेकू नका, सौंदर्यवाढीसाठी होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या
- केळ ‘या’ खास पदार्थांसोबत खाल्ले तर होतील ‘हे’ खास लाभ, जाणून घ्या
- शाकाहारी व्यक्तींना मिळू शकतात नॉनव्हेजचे फायदे, ‘हे’ आवश्य सेवन करा
- आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने धुवा दूधाने केस, होतील ‘हे’ खास फायदे