पोलीसनामा ऑनलाइन टीम – पती पत्नीमधील नाते अत्यंत मजबूत आणि प्रेमाचे असते आणि जीवनातील सर्वात महत्वपूर्ण नाते असते. या नात्याला आयुष्यभर चांगल्या पद्धतीने निभावने आवश्यक असते. परंतू या नात्यात काही गैरसमज झाले तर अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. या वादातून अनेकादा प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. याला काही महत्वाची कारणे आहेत ज्याने घटस्फोट होत असतात.
१. एक दुसऱ्याची काळजी न घेणे –
लग्ननंतर काही काळ पती – पत्नी एक दुसऱ्याची काळजी घेतात परंतू जसा जसा काळ जातो तस तसे एकमेकांची काळजी घेणे बंद करतात. घटस्फोटामधील हे मुख्य कारण असू शकते.
२. वाद होणे –
पती पत्नीत एकमेकांना समजून घेण्याचे प्रमाण कमी होणे आणि त्यातून वाद निर्माण होणे. अशाने हा वाद घटस्फोटापर्यंत जातो.
३. दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण –
आज घटस्फोट घेण्याचे मुख्य कारण एकमेकांना फसवणे देखील झाले आहे. पती पत्नी एकमेकांना सोडून दुसऱ्यांकडे आकर्षित होतात.
४. अधिक अपेक्षा ठेवणे –
लग्ना आधी मुलगा मुलगी आपल्या साथीदाराकडून अनेक अपेक्षा ठेवतात. परंतू लग्नानंतर या अपेक्षा पूर्ण न झाल्यास त्यातून हे प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊ शकते.
५. कुटूंबाकडून करण्यात आलेले दबावातून लग्न –
अनेकदा मुला मुलीच्या घरचांच्या दबावातून लग्न करतात, परंतू त्यांना आपल्या साथीदाराबरोबर ते नाते टिकवता येत नाही. ज्यामुळे घटस्फोट होतो.
६. पतीने पत्नीवर हात उचलणे –
पती पत्नीत वादाचे आणखी एक कारण म्हणजे पती पत्नीवर हात उचलतो. काही वेळा मारहाण करतो. तर असे नाते अनेक दिवस टिकू शकत नाही आणि शेवटी घटस्फोट होतो.
- केसगळती होतेय का ? ‘हे’ ६ साधे-सोपे घरगुती उपाय करा
- आंब्यातील कोय फेकू नका, उपयोगात आणल्यास करेल औषधाचे काम
- ‘सुपारी’ खाऊन ‘या’ ४ आजारावर करा कंट्रोल, जाणून घ्या
- आरोग्यासंदर्भातील ‘या’ महत्वाच्या ११ प्रश्नांची उत्तरे आवश्य जाणून घ्या !
- सावधान ! लहान मुलं सतत मोबाईल घेत असतील तर ‘हे’ नक्की वाचा
- ‘या’ ४ घरगुती उपायांनी करा कुरळे ‘केस’ सरळ