IND Vs SL : तिसऱ्या T 20 साठी ‘गब्बर’ धवन सहित ‘या’ 3 खेळाडूंना दिला जाऊ शकतो ‘डच्चू’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि श्रीलंकेदरम्यान दरम्यान तिसरा आणि अंतिम टी-20 सामना 10 जानेवारीला सायं. 7:00 वाजता सुरु होईल. पुण्यामध्ये हा सामना रंगणार आहे. या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसऱ्या सामन्यात भाताने विजय मिळवला होता.

पुण्यात खेळल्या जाणार्‍या मालिकेचा हा अंतिम सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे कारण जर हा सामना भारत जिंकला तर मालिका जिंकेल, आणि श्रीलंकेच्या संघालाही या सामन्यात भारताला नमवून मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या सामन्यात देखील फॉर्मात न आलेल्या शिखर धवनसह 3 खेळाडूंना डच्चू देण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांचा देखील समावेश आहे. या खेळाडूंनी मागील सामन्यात कोणतेही विशेष प्रदर्शन केलेले नाही.

या खेळाडूंच्या जागी विराट कोहली संजू सॅमसंगला सलामीवीर म्हणून संघात समाविष्ट करू शकेल, त्याच्याशिवाय रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहलही संघात परतू शकतात.

अशी असेल तिसऱ्या सामन्यातील संभाव्य टीम
1. केएल राहुल, 2. संजू सँमसंग, 3. विराट कोहली, 4. श्रेयस अय्यर, 5. ऋषभ पंत, 6. रविंद्र जडेजा, 7. कुलदीप यादव, 8. युजवेंद्र चहल, 9. शार्दुल ठाकुर, 10. जसप्रीत बुमराह, 11. नवदीप सैनी

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/