नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि श्रीलंकेदरम्यान दरम्यान तिसरा आणि अंतिम टी-20 सामना 10 जानेवारीला सायं. 7:00 वाजता सुरु होईल. पुण्यामध्ये हा सामना रंगणार आहे. या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसऱ्या सामन्यात भाताने विजय मिळवला होता.
पुण्यात खेळल्या जाणार्या मालिकेचा हा अंतिम सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे कारण जर हा सामना भारत जिंकला तर मालिका जिंकेल, आणि श्रीलंकेच्या संघालाही या सामन्यात भारताला नमवून मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या सामन्यात देखील फॉर्मात न आलेल्या शिखर धवनसह 3 खेळाडूंना डच्चू देण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांचा देखील समावेश आहे. या खेळाडूंनी मागील सामन्यात कोणतेही विशेष प्रदर्शन केलेले नाही.
या खेळाडूंच्या जागी विराट कोहली संजू सॅमसंगला सलामीवीर म्हणून संघात समाविष्ट करू शकेल, त्याच्याशिवाय रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहलही संघात परतू शकतात.
अशी असेल तिसऱ्या सामन्यातील संभाव्य टीम
1. केएल राहुल, 2. संजू सँमसंग, 3. विराट कोहली, 4. श्रेयस अय्यर, 5. ऋषभ पंत, 6. रविंद्र जडेजा, 7. कुलदीप यादव, 8. युजवेंद्र चहल, 9. शार्दुल ठाकुर, 10. जसप्रीत बुमराह, 11. नवदीप सैनी
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘या’ 5 टिप्स फॉलो केल्यास दिवसाची सुरुवात होईल चांगली
- दाढी करण्यासाठी ‘रेझर’ वापरताय? ‘या’ 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका !
- मुलांना कोणतं खेळणं देताय ? होऊ शकतात ‘हे’ 6 गंभीर धोके !
- ‘अॅस्प्रिन’ने टळू शकत नाही ‘हार्ट अटॅक’चा धोका ! हे आहेत 4 धोके
- ‘टीबी’ ची ही 6 कारणे जाणून घेतली तर टाळता येणे सहज शक्य, जाणून घ्या
- काळे मीठ खा; हृदयरोगांना दूर ठेवा, ‘हे’ आहेत 9 फायदे
- मुलांना होणारा क्षय ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या
- मुलांना ‘पॅरासिटामोल’ देताय ? तारुण्यात होईल अस्थमा ! ‘हे’ आहेत 6 धोके
- दम्याची ही आहेत 8 लक्षणे, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर वाचा