मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीवरील सगळ्यात प्रसिद्ध मालिका ‘तुला पाहते रे’ ने अखेर शेवटचा निरोप घेतला. प्रेक्षकांसाठी ही खूप नाराजीची गोष्ट आहे. कारण इतके दिवस ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहत होते. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला होता. ईशा आणि विक्रांतची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली होती. प्रेक्षक खूप उत्सुकतेने ही मालिका पाहत होते पण या मालिकेच्या शेवटच्या भागाने मात्र प्रेक्षकांना नाराज केले आहे.
https://twitter.com/subodhbhave/status/1152611820340797441
ही मालिका जेव्हा सुरु झाली तेव्हाच या मालिकेचे जास्त भाग नसणार याची कल्पना दिली गेली होती त्यामुळे मालिकेची कथा खूप रेखाटली गेली होती. अचानक मालिका शेवटच्या वळणावर येऊन प्रेक्षकांनी जेव्हा याचा शेवट विक्रांत मृत्यू झाल्याचे पाहिले तेव्हा हा शेवट सगळ्यांसाठी आश्चर्यकचकित होता. ही मालिका आता पुन्हा दिसणार नाही म्हणून अनेक चाहते नाराज झाले आहेत.
विक्रांत, तू ज्या मस्तीत, बेफिकिरीत, तुझ्या अटींवर आयुष्य जगलास, धारदार, साहसी, बेधुंद!त्याच मस्तीत तुझा शेवट केलास! असा खलनायक ज्याच्यासाठी मनात केवळ प्रेम व प्रेमच येतं! चाहत्यांसाठी अनभिषिक्त ह्रदयसम्राट! दिलदार, तडफदार! तुझा असा शेवट नको होता रे! तू जगायला हवं होतंस विक्रांत! pic.twitter.com/mshRlYkWsM
— Ira (@iravatikulk) July 20, 2019
‘तुला पाहते रे’ या मालिकेचा शेवट प्रेक्षकांना आवडला नाही. नुकतेच अभिनेता सुबोध भावेने प्रेक्षकांचा निरोप घेण्यासाठी ट्विटरवर एक फोटो शेअर करुन प्रेक्षकांचे आभार मानले. या फोटोवर अनेकांनी कमेंट केली. कमेंटमध्ये काहींनी कौतुक तर काहींनी यासाठी नाराजगी व्यक्त केली. अनेकांनी ‘तुला पाहते रे सीजन २’ ची मागणी केली. काही प्रेक्षकांनी भावनिक कमेंट तर कोणी सीरियलची खिल्ली उडविली आहे.
एका युजरने कमेंट केली की, ‘ ‘तुला पाहते रे पार्ट २’ मध्ये विक्रांत पुर्नजन्म घेऊन तो ईशाचा बदला घेणार असल्याचे दाखवा. यामध्ये ईशा ४० वर्षाची आणि सुबोध २० वर्षाचा दाखवा त्याचबरोबर या मालिकेला टॅग लाइन ‘पुर्नजन्म भी बहुत बडी चीज होती है बाबु’ अशी द्या’ दुसऱ्या युजरने लिहले की, ‘माझी आई या सीरियलचा शेवटचा भाग पाहून खूप रडली. आयुष्यातला सर गेल्यासारखी तिची परिस्थिती होती.
तुमची मालिका खूप सुंदर होती तसेच तुमची अॅक्टींग फारच चांगली होती आणि आहेच…आमच्या मनात मालिका व तुमची अॅक्टिंग दोन्ही घर करून गेली..
या लवकर एक नवीन पर्व घेवून..!— Riyaj Naikawadi (@RiyajNaikawadi) July 21, 2019
‘तिसऱ्या युजरने लिहले की, ‘आम्ही तुम्हाला पुन्हा पाहू शकणार नाही. तुम्हाला खूप मिस करु. पुढच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला शुभेच्छा.’ तिसऱ्या युजरने लिहले की, ‘२९८ एपिसोड बहुत छोटी चीज होती है बाबु.’ तर एकाने लिहले की, ‘सुटलो एकदाचा’ अशा वेगवेगळ्या कमेंट करुन प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
या मालिकेच्या जागी एक नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचे नाव ‘अग्गबाई सासुबाई’ प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेला सुरुवात झाली आहे. पाहूया आता या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते की नाही.
मालिका विश्वात..पहील्यांदाच या मालिकेवर सर्वांनीच एवढे भरभरून प्रेम केले..मालिकेतील सर्वच वळणे व त्यामधील उलगडे प्रचंड तग धरून ठेवणारी होती..तरीही कोणत्याही गोष्टीचा कधीतरी शेवट होतोच..हे जरी सत्य असले तरीही चतुर आणि बुद्धीमान विक्रांत चा असा शेवट मान्य करायला खुपच त्रास झाला..😢
— Archana Tribhuvane (@ArchanaTribhuv1) July 20, 2019
- रात्री झोप येत नाही ; मग असा करा तुमच्या आहारात बदल
- लूज स्किनला ‘असे’ करा टाईट
- दृष्टी वाढवण्यास फायदेशीर ठरु शकतात ‘या’ गोष्टी, जाणून घ्या कोणत्या*
- पस्तीशीनंतर बाळाला जन्म दिल्यास होऊ शकतो ‘हा’ आजार
- गरोदर असताना महिलांनी अशी घ्यावी स्वत:ची काळजी