जयंत पाटील, मी चांगलं काम करतो म्हणून इतका दुस्वास करता का ?

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन – जयंत पाटील, मी चांगलं काम करतोय म्हणून का तुमच्या काळात तुम्हाला जमलं नाही म्हणून, इतका दुस्वास करता का?, असा सवाल नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केला आहे. ते इस्लामपूरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीने घेतलेल्या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले. यापुढे राष्ट्रवादीला जी भाषा समजते त्याच भाषेत आता उत्तर दिले जाईल, असंही निशिकांत यांनी सांगितलं.

आमदार जयंत पाटील यांनाच इस्लामपूर शहराचा विकास नको आहे. म्हणून ते आणि त्यांचे नगरसेवक कामात अडथळा आणत आहेत. इस्लामपुरात साडे सतरा हजार मताधिक्य असणाऱ्या जयंत पाटलांनी जनतेचा कौल स्वीकारून विकासात मदतीची भूमिका घेणे अपेक्षित होते, पण दुर्दैवाने त्यांनाच इस्लामपूरचा विकास नकोय. स्वतःच्या हिमतीवर मत मांडेल असा एकही नेता त्यांना तयार करता आला नाही, हे त्यांचे अपयश आहे. राजारामबापू कारखान्यावरून प्रेसनोट तयार होऊन येते आणि हे वाचून दाखवतात हे दुर्दैवी आहे, अशी टीका निशिकांत पाटील यांनी केली.

भाजपला सत्तेतून घालवल्या शिवाय राहणार नाही ; मुंडेंची सिंहगर्जना

नगराध्यक्षांनी कसे काम करावे?, हे राष्ट्रवादीने सांगणे हास्यास्पद आहे. यापूर्वीच्या सत्ताकाळात अल्पसंख्याक नगराध्यक्ष आप्पा कोरे यांना काय वागणूक दिली? सांभारे आबांना सहा महिने घरात बसूनच काम करावे लागले, वाय. एस. जाधव यांना तर पोलिसांकरवी अटक झाली, मुनीर पटवेकर यांच्या नगराध्यक्ष केबिनला कुलूप लावले गेले, संजय कोरे उपनगराध्यक्ष असताना त्यांच्या टेबलावर चपलेचे पाय आणि खुर्चीत पाणी ओतले गेले, असे असताना यांनी आम्हाला कामकाज शिकवणे हास्यास्पद आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

तसंच, ज्यांना जनतेनेच नाकारले ते आम्हाला परंपरा शिकवितात. ज्या मित्राबरोबर एका ताटात जेवत होते, तो अडचणीत आल्यावर त्याच्या आणि बायकोमुलांविषयी हे काय बोलतात याची ऑडिओक्लिप सार्वजनिक करावी का ? म्हणजे जनतेला कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ माजी मंत्र्याचे महिलेशी गैरवर्तन; व्हीडिओ व्हायरल