‘लायकी सुधा नाही मग Z सुरक्षा कशाला ? हा उघड सत्तेचा दुरोपयोग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत देखील वाढ केली असून आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर यावरून भाजपचे नेते निलेश राणे आक्रमक झाले असून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

निलेश राणे म्हणाले की, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना कुणी धमकी दिलेली नाही किंवा कुणाला धमकी देण्याची त्यांची लायकी नाही. तसेच त्यांच्यावर एक केस देखील दाखल नाही. असे असतानादेखील त्यांना झेड सुरक्षा देण्याची गरज तरी काय? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच ते पुढे म्हटले की हा उघडपणे सत्तेचा दुरुपयोग आहे. आणि हा दुरुपयोग महाराष्ट्राच्या जनतेला कधीच पटणारा नाही. त्यामुळे लवकरच ठाकरे सरकार तोंडावर पडणार असल्याची टीका केली.

महाराष्ट्रात सरकारकडून जवळपास ९७ व्हीआयपींना सुरक्षा पुरविण्यात येते. यापैकी सुमारे २९ व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेत बदल करण्यात आले असून काही लोकांच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरसह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, तसेच वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याचे दिसते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/