वाटलं होतं शिवसैनिक चवताळतील, पण हे हिजडे निघाले – निलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे. ठाकरे कसे आहेत ते कळल्यावर लोकच अंगावर कपडे ठेवणार नाही, अशी गंभीर टीका निलेश राणेंनी केली आहे. तसंच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही त्यांनी टीका केली आहे.

मला वाटलं होतं खूप मोठा उद्रेक होईल. शिवसैनिक चवताळतील, अंगावर येतील. पण हे साले सगळे हिजडे निघाले. एकाच्यातही दम नाही’, अशा शेलक्या शब्दांत निलेश राणेंनी शिवसैनिकांवर टीका केली. शिवसैनिकांनाही खरं काय आहे हे माहिती आहे. निलेश राणे तेव्हा अर्धवटच बोलला होता. पण एक फाईट वातावरण टाइट झालं की नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

आम्ही काय बाळासाहेबांबद्दल बोलायचं नाही का. तुझा देव तुझ्या देवाऱ्यात ठेव मी माझा देव माझ्या देवाऱ्यात ठेवीन, असं राणेंनी ठणकावलं. तसंच आमच्या नादाला लागायचं नाही. ठाकरेंची अब्रू रस्त्यावर काढू. मातोश्रीच्या कोणत्या माळ्यावर काय काय व्हायचं आम्हाला माहिती आहे. ठाकरे कसे आहेत कळल्यावर लोकच अंगावर कपडे ठेवणार नाहीत, असं निलेश राणे यांनी म्हटले.

दरम्यान, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूसाठी निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरेंना जबाबदार ठरवलं होतं. तसंच सोनू निगमच्याही हत्येचा कट रचला होता, असा आरोप केला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.