निर्भया केस : … म्हणून निर्णय माहित असताना देखील खटला लढलो, दोषींच्या वकिलानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : शुक्रवारी पहाटे निर्भयाच्या दोषींना तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. सात वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळविण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. डिसेंबर २०१२ मध्ये एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या दोषींना अखेर शिक्षा झाली, ज्यामुळे समाजातील जघन्य गुन्ह्यांचा विचार करणाऱ्यांच्या मनातही भीती निर्माण झाली.

दुसरीकडे निर्भया प्रकरणातील आरोपीचे वकील एपी सिंह म्हणाले की, या प्रकरणात निर्णय येईल हे मला पहिल्या दिवसापासूनच माहित होते, तरीही मी हे प्रकरण हातात घेतले. ते म्हणाले की, मला हे प्रकरण हाती घ्यायचे नव्हते, मी ते घेण्यास नकार दिला. पण दोषी पवनच्या पत्नीने मला माझ्या आईसमोर विनंती केली, म्हणून मी हा खटला उचलला.

एपी सिंह म्हणाले की, हे प्रकरण हाती घेतल्यावर मला धमक्या मिळाल्या, सोशल मीडियावर शिवीगाळ देखील करण्यात आला. ते म्हणाले की, निर्भयाच्या मृत्यूचा राजकीय फायदा घेण्यात आला. त्यांनी अरविंद केजरीवाल त्यांच्यावर जागो- जागी निषेध नोंदविल्याचा आरोप केला.

दरम्यान, निर्भयाच्या दोषींना फाशीची शिक्षा होताच तिहार कारागृहाबाहेर एक वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. यावेळी, तिहारच्या बाहेर जमलेले स्थानिक लोक निर्भया जिंदाबादची घोषणाबाजी करताना दिसले. यासह, त्यांनी दोषींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलावर जोरदार हल्ला चढविला. फाशीची बातमी समजताच तिहार कारागृहाच्या गेट नंबर तीनच्या बाहेर जमलेल्या जमावाने ‘निर्भया जिंदाबाद, एपी सिंह मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी लोकांनी उत्साहात मिठाई वाटत आनंद व्यक्त केला.