निर्भया केस : ‘सिस्टीम’ वरील लोकांचा विश्वास कमी होतोय, सॉलिसिटर जनरल मेहतांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चारही दोषींना स्वतंत्रपणे फाशी न देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी केली. सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, निर्भयाचे दोषी कायद्याचा गैरवापर करीत आहेत. यामुळे बलात्काराच्या आरोपींचा एन्काऊंटर झाल्यास जनता आनंद साजरा करते. ते म्हणाले, ‘आम्ही याला पाठिंबा देत नाही, परंतु त्यातून एक गोष्ट समोर आली की, लोकांचा कायद्यावरील विश्वास कमी होत चालला आहे.’ या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे.
या खटल्याच्या सुनावणीवेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला एक तक्ता सोपविला. त्यातील दोषींचे संपूर्ण तपशील असल्याचे मेहता यांनी कोर्टात सांगितले. यानंतर न्यायमूर्ती अशोक भूषण म्हणाले, “पवन यांनी अद्याप हायकोर्टाच्या आदेशानंतरही आपला रेडिम वापरला नाही. आपण सक्ती करू शकत नाही. परंतु मृत्यूच्या वॉरंटसाठी खालच्या कोर्टात जाऊ शकतो.
Supreme Court: Justice Bhushan asks Solicitor General Tushar Mehta, "Your chart shows 3 mercy petitions have been rejected. Pawan hasn't filed. Why don't you file for a fresh death warrant?". https://t.co/iXTHWOx2x5
— ANI (@ANI) February 11, 2020
सुनावणीदरम्यान तुषार मेहता यांनी कोर्टाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की, तुरूंगातील नियमावलीच्या नियम 836 चा निकाल देताना दोषींना स्वतंत्रपणे फाशी दिली जाऊ शकते. मेहता म्हणाले, “दोषी लोक कायद्याचा गैरवापर करीत आहेत.” सॉलिसिटर जनरल म्हणाले की मुकेश, विनय आणि अक्षय या तिन्ही दोषींनी रेमेडी संपल्याने दोषींना एकत्र किंवा स्वतंत्रपणे लटकवण्याची परवानगी देण्यात यावी. विशेष म्हणजे मागील सुनावणीदरम्यान कोर्टाने चार दोषींना नोटीस बजावली होती. कोर्टाने ही नोटीस बजावत एका आठवड्याची मुदत दिली आणि दोषींना एका आठवड्यात त्यांचे सर्व कायदेशीर पर्याय वापरावेत असे आदेश दिले.