Nitesh Rane | ‘तो फक्त सिरीयल पुरताच आहे…,’ म्हणत नितेश राणेंकडून अमोल कोल्हेंवर एकेरी शब्दात टीका

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बोलताना राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते. असे वक्तव्य केले होते.( Nitesh Rane) त्यावर सत्ताधारी भाजपने अजित पवार यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार नितेश राणे हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर नितेश राणे यांनी आपल्या कणकवली मतदारसंघात वाहनांवर ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ अशा आशयाचे स्टिकर लावण्याची मोहिम हाती घेतली होती. याच मुद्यावरून सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत आहेत. काल दि.११ वर्धा येथे आयोजीत सभेत बोलताना त्यांनी या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर देखील टीका केली. यावेळी त्यांनी( Nitesh Rane) अमोल कोल्हे यांना लक्ष करत एकेरी भाषेत त्यांना सुनावले.

नितेश राणे( Nitesh Rane) म्हणाले, ‘तो कुठलातरी अमोल कोल्हे पैसे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो. त्याला सिरियसलसाठी पैसे दिले जातात. तो फक्त नावासाठी निवडून आलेला आहे. त्याला २०२४ साली पराभूत करून टाकू. दाढी काढल्यावर त्याला कोणी ओळखणार पण नाही. तो फक्त सिरियल पुरताच आहे.’ असा अमोल कोल्हेंबाबत एकेरी उल्लेख करत त्यांनी टीका केली.

तसेच यावर पुढे बोलताना ते( Nitesh Rane) म्हणाले, ‘पेपरवर कोणीतरी काहीतरी लिहून देतो आणि आमचे
अजित पवार तेच वाचून दाखवतात. तुम्ही काय वाचताय? वर्षानुवर्षे संभाजी महाराजांनी जी उपाधी लावलेली आहे,
ती तुम्हाला अमोल कोल्हेमुळे लगेच पुसून टाकायची आहे का?’
असा सवाल देखील यावेळी बोलताना त्यांनी विरोधीपक्षनेते अजित पवार यांना विचारला आहे.

अमोल कोल्हेंवर टीका करताना नितेश राणे( Nitesh Rane) म्हणाले की, ‘मागील अनेक पिढ्यांपासून आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीरच म्हणतो. आमच्या अगोदरच्या पिढीनेही त्यांना धर्मवीरच म्हटलेलं आहे.
येणाऱ्या पिढीसाठीही संभाजी महाराज यांची धर्मवीर अशीच ओळख असेल. आता कोणीतरी उठतं.
आपली सिरियल चालावी म्हणून ते नवनवीन गोष्टी आणतात.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते.’ त्यामुळे हा केवळ अमोल कोल्हे यांची सिरीयल चालावी म्हणून
वाद निर्माण करण्यात आला आहे. असे देखील नितेश राणे म्हणाले.

Web Title :- Nitesh Rane | nitesh rane criticizes amol kolhe on sambhaji maharaj dharmaveer controversy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RRR Movie | RRR या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान जरी हुकला तरी ‘नाटू नाटू’ने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत रचला इतिहास

Taapsee Pannu | ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाच्या सिक्वेलचे पोस्टर तापसीने केले शेअर; प्रेक्षक झाले आतुर