नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम ३७० रद्द केल्यापासून यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि राजकारण सुरु आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मिश्कीलपणे एक वक्तव्य केले. ते म्हणाले की, राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांचे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या मुलीशी लग्न झाले आहे. आमच्या सरकारने तर निर्णय घेऊन राजेश पायलट यांचा फायदाच करून दिला आहे. सचिन पायलट हे दिवंगत कॉंग्रेस नेते राजेश पायलट यांचा मुलगा आहे.
वास्तविक, नितीन गडकरी जयपूर येथे ‘एक राष्ट्र – एक संविधान’ या विषयावर बोलत होते. या दरम्यान, गडकरी यांनी कॉंग्रेसचे युवा नेते आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या मुलीशी लग्न केल्याबद्दलही भाष्य केले.
नेमकं काय म्हणाले गडकरी :
गडकरी म्हणाले, ‘मी कोणतेही राजकीय भाष्य करीत नाही. सचिन पायलटचे फारूक अब्दुल्लाच्या मुलीशी लग्न झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अशी कायदेशीर तरतूद होती की तिथल्या मुलीने पाकिस्तानमधील एका युवकाशी लग्न केले तर त्याला या बहाण्याने जम्मू-काश्मीरचे भारताचे नागरिकत्व मिळू शकेल. परंतु जम्मू-काश्मीरमधील एखाद्या मुलीने भारतीय नागरिकाशी लग्न केले तर तिला मालमत्तेचा हक्क गमवावा लागेल किंवा नागरी हक्कही मिळत नाहीत. त्यामुळे हा कायदा रद्द झाल्यामुळे फारुख अब्दुल्लाचा मुलगा उमर अब्दुल्ला आणि त्यांची मुलगी दोघांनाही समान हक्क मिळतील. माझा विश्वास आहे की आमच्या सरकारने तर राजेश पायलट यांना फायदाच दिला आहे. नितीन गडकरी म्हणत गडकरी खळखळून हसले.
https://twitter.com/BJPsatishpoonia/status/1176395053012439040
काँग्रेसवर कडाडून टीका :
यावेळी गडकरींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, सतत तुष्टीकरणाच्या धोरणामुळे काश्मीरची दुर्दशा झाली आहे. हे सर्व कॉंग्रेसमुळे झाले. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी काश्मीरच्या बाबतीत अतिशय घाई केली. नितीन गडकरी म्हणाले, डॉ भीमराव आंबेडकर यांच्यासह अनेकांनी संविधान सभेत कलम ३७० ला विरोध दर्शविला होता, परंतु नेहरूंनी सर्वांना बाजूला सारले आणि हा निर्णय घेतला.
नितीन गडकरी म्हणाले, काश्मीर तुरूंगात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे निधन कसे झाले यावर आजही शंका आहे. नेहरू आणि कॉंग्रेसने केलेली चूक म्हणून पाकिस्तानने शस्त्रे म्हणून वापरली. वास्तविक पाहता काश्मीर आपला आहे. पीओकेवरही आपलाच अधिकार आहे.
Visit : policenama.com
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय