मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या मुद्यावरून शिवसेनेनं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण, जाणून घ्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण देण्याचा मुद्दा राखडताना दिसत आहे. नुकतेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले होते की, राज्यात ५ टक्के मुस्लिम आरक्षण परत आणण्यासाठी सरकार कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच याची अंमलबजावणी होईल. पण आता आरक्षणावर शिवसेनेचा ताबा सुटल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने या संदर्भातील कोणत्याही प्रस्तावास नकार दिला आहे.
दरम्यान, शनिवारी विश्व हिंदू परिषदेने एका ट्विटमध्ये धार्मिक आधारावर आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला होता. मुस्लिम आरक्षणाबद्दल चिंता व्यक्त करताना विश्व हिंदू परिषदेने म्हंटले की, शिवसेनेकडून अल्पसंख्याक समाधानाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. शिवसेनेने नंतर त्या ट्विटला प्रत्युत्तर देताना म्हटले की, ‘अशा निर्णयाचा विचार केला जात नाही.’
Video statement of shri @MParandeVHP on Shiv Sena lead Maharashtra Govt intends to give reservation to Muslims on religious grounds… pic.twitter.com/ElWozuEBoD
— Vishva Hindu Parishad -VHP (@VHPDigital) February 29, 2020
आरक्षणाच्या मुद्दय़ावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे मुस्लिमांसाठी असंवैधानिक आहे आणि याचा इतर मागासवर्गीय आणि मराठा आरक्षणावर परिणाम होईल. फडणवीस म्हणाले, ‘कोणत्या मुद्द्यांवरून शिवसेनेने तडजोड करुन सरकार स्थापन करण्याची आपली विचारसरणी सोडली आहे, हे आपल्याला माहित असले पाहिजे.’ मुस्लिम नेत्यांना अतिरिक्त आरक्षण दिल्यास ओबीसींना आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळू शकणार नाही, असा आरोप भाजप नेत्यांनी केला. महाराष्ट्रात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिले होते आणि यासंदर्भात अध्यादेशदेखील काढला होता.