भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा निषेध करताना अमित शहा यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला होता. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे. आयोगाला जर लाज वाचवायची असेल तर तृणमूलच्या नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शहांनी केली होती.
Election Commission: No election campaigning to be held in 9 parliamentary constituencies of West Bengal – Dum Dum, Barasat, Basirhat, Jaynagar, Mathurapur, Jadavpur, Diamond Harbour, South and North Kolkata from 10 pm tomorrow till the conclusion of polls. pic.twitter.com/cTpKS6jFwp
— ANI (@ANI) May 15, 2019
निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेत एक दिवस आगोदरच प्रचार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात अशा प्रकारे प्रचार बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पश्चिम बंगालमध्ये १९ मे रोजी मतदान होत असून प्रचार १७ मे रोजी बंद होणार होता. मात्र काल झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.